एक्स्प्लोर

बेकायदेशीर इमारतींचं प्रमाण इतकं मोठ आहे की, दोन महिन्यांतही अहवाल तयार नाही? : हायकोर्ट

गेल्यावर्षी भिवंडी येथील 'जिलानी' इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात सुमोटो याचिकेअंतर्गत मुंबईसह आसपसाच्या सर्व महापालिकांना धोकादायक आणि बेकायदेशी इमारतींवरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जानेवारीत दिले होते. मात्र बुधवारच्या सुनवणीत याची पूर्तता न झाल्यानं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई : सुशिक्षित समाजात बेकायदेशीर बांधकामांना खतपाणी घातलंच कसं जाऊ शकतं? कुठल्याही आराखड्याविना तयार झालेल्या इमारतींना पालिका नियमित कसं करतं? असे सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी मुंबई, ठाण्यासह आसपासच्या सर्व पालिका प्रशासनांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बेकायदेशीर बांधकामांबाबत पालिकांचा असाच ढिसाळ करभार राहिला तर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व पालिका आयुक्तांना कोर्टात उभं करू, असा गर्भित इशारा मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी वकिलांना दिला. 

गेल्यावर्षी भिवंडी येथील 'जिलानी' इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात सुमोटो याचिकेअंतर्गत मुंबईसह आसपसाच्या सर्व महापालिकांना धोकादायक आणि बेकायदेशी इमारतींवरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जानेवारीत दिले होते. मात्र बुधवारच्या सुनवणीत याची पूर्तता न झाल्यानं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली. बेकायदेशीर बांधकामांचं प्रमाण इतकंय की, दोन महिन्यांतही त्याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकत नाही हे आमच्या लक्षात आलंय, असंही हायकोर्टानं पालिका प्रशासनांना सुनावलं.   

मुंबईसह आसपासच्या महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न गंभीर असतानाही, गेल्या तीन वर्षात अशा बेकायदेशीर बांधकामांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी देण्यात अडचणी काय?, असा सावल हायकोर्टानं बुधवारी उपस्थित केला. दरवर्षी मॉन्सूनमध्ये धोकादायक इमारती कोसळून लोकांचे जीव जातायत, मात्र त्याची पर्वा कुणालाच नाही?, धोकादायक इमारतीतील लोकांना घरं खाली करावी लागतात, आणि मग वर्षानूवर्ष ही लोकं बेघर राहतात. दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई दिली की झालं का? याकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याबद्दल राज्याच्या नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांना का जबाबदार धरू नये?, अशी विचारणाही हायकोर्टानं महाधिवक्त्यांना केली. प्रशासनाच्या एकंदरीत कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टानं याप्रकरणाची सुनावणी 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली. 

काय आहे प्रकरण? 

मुंबईसह आसपासच्या महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामांप्रकरणी राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निझामपूर आणि पनवेल महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी किती जणांना नोटीस बजावल्या?, किती अनधिकृत बांधकामांवर काय कारवाई केली?, इमारत दुर्घटनेत किती नुकसानभरपाई दिली?, याची वार्डनुसार माहिती देण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले आहेत.

भिवंडीतील 'जिलानी' ही तीन मजली इमारत कोसळली. त्या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या अनधिकृत बांधकामांची दखल घेत हायकोर्टानं याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारच्यावतीनं कोर्टाला सांगितलं गेलंय की, अनधिकृत बांधकामांवर राज्य सरकार जिओ मॅपिंगद्वारे लक्ष ठेवून आहे. आणि ती वाढू नयेत यासाठी खबरदारीही घेतली जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Embed widget