एक्स्प्लोर

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! रेल्वे ट्रॅक अन् रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात, मशीद बंदर स्टेशनचं वॉटरपार्क झालं

Mumbai Rain Updates: मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत पुढील काही तासांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज. वारेही प्रचंड वेगाने वाहत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली

Mumbai News: राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने मुंबईत सकाळी 10 वाजले तरी अंधार पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईत (Mumbai Rains) पुढील दोन ते तीन तासांत मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहतील, असा अलर्ट दिला होता. त्यानुसार, गेल्या तासाभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात (Mumbai Local Train) रुळांवरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. (Heavy Rain in Mumbai)

आज सकाळपासूनच मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा वेग मंदावला होता. मात्र, आता माटुंगा रेल्वे स्थानकात जास्त पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. ठाणे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद आणि धिम्या गतीच्या लोकल गाड्या या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याचे अनाउन्समेंट सुद्धा रेल्वे स्थानकावर केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. साचलेले पाणी जवळपास फलाटाच्या उंचीला पोहोचल्याने मध्ये रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी 10 वाजता वाहनांच्या हेडलाईट सुरु असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पुढील दोन तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेमार्गावरील अन्य स्थानकांवरही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचू शकते. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केली होती. मात्र, पालिकेचे हे सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरताना दिसत आहेत.

Raigad News: ठाण्यात आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस

मुंबईत जोरदार पाऊस असला तरी ठाण्यात अद्याप तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. तर अंबरनाथ, बदलापूर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. कर्जत तालुक्यातही पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे मे महिन्यातच उल्हास नदीला पूर आला आहे. या नदीवरील नेरळ दहिवली येथील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे.

आणखी वाचा

मुंबईत सकाळी 10 वाजता अंधार, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांचे हेडलाईट ऑन, प्रचंड वाहतूक कोंडी PHOTO

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Embed widget