एक्स्प्लोर

तृतीय पंथीयांना आरक्षण द्या, ठाण्याच्या महापौरांची मागणी

तृतीय पंथीयांना शासकीय कोट्यात एक टक्का आरक्षण द्या, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे.

ठाणे: तृतीय पंथीयांना शासकीय कोट्यात एक टक्का आरक्षण द्या, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्रही दिलं आहे. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं महापौर मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं आहे. तृतीयपंथी म्हटलं की आपल्यासमोर चित्र उभं राहतं ते सिग्नलवर, रेल्वेत किंवा एखाद्या बाजारपेठेत टाळ्या वाजवून पैसे मागणाऱ्या आणि उपेक्षित जीवन जगणाऱ्या जमातीचं. त्यांना सहानुभूती सगळेच दाखवतात, पण जवळ मात्र कुणीही करत नाही. चीड, धिक्कार, किळस, सहानुभूती अशा अनेक भावनांचे कटाक्ष झेलणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी ही मागणी म्हणजे जणू वाळवंटात दिसलेला जलाशयच. अलीकडेच तृतीयपंथीयांना निवडणुकीत मतदान करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. पण तो देखील केवळ राजकीय फायद्यापोटीच असल्याचा तृतीयपंथीयांचा आरोप आहे. कारण मतदान करताना नागरिक असलेल्या या तृतीयपंथीयांना नागरिक म्हणून जगण्याचाही अधिकार असला, तरी उपजीविकेचं हक्काचं साधन मात्र उपलब्ध नाही. आणि त्यामुळंच अगदी देहविक्रय करण्यापर्यंतची वेळ तृतीयपंथीयांवर आली आहे. या सगळ्यातून तृतीयपंथीयांना बाहेर काढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं, आणि त्यांनाही सन्मानानं जगता यावं, यासाठी ठाणे महापालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. तृतीयपंथीयांना शासकीय कोट्यात १ टक्का आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली, तर शासकीय कार्यालयं, आणि सर्वच सरकारी विभागात काम करण्याची संधी तृतीयपंथीयांना मिळू शकते. महापौरांच्या या मागणीचं तृतीयपंथीयांनी स्वागत केलं आहे. आजवर आम्हाला प्रत्येकानं निव्वळ वापरुन घेतलं, पण जवळ कुणीही केलं नाही. त्यामुळं महापौरांची ही मागणी आमच्यासाठी चांगली असल्याचं मत तृतीयपंथींनी व्यक्त केली. शिवाय आम्हाला अनेक लोक आश्वासनं देतात, मात्र वेळ आली की साधं जवळ बसूही देत नाहीत. त्यामुळं आम्हाला शासकीय कोट्यात आरक्षण मिळाल्यास हक्कानं आणि सन्मानानं जगता येईल, असं तृतीयपंथीयांचं मत आहे. तृतीयपंथी हे आजवर सेवा देण्याचं काम करत आलेत, त्यामुळं यापुढेही लोकांची सेवा होईल, असं काम करण्याची संधी मिळाल्यास ते काम तृतीयपंथी आनंदानं स्वीकारतील, असा किन्नर आखाड्याचा विश्वास आहे. तृतीयपंथीयांना सन्मानानं जगण्यासाठी त्यांना हक्काचा रोजगार गरजेचा आहे, आणि तो मिळाला, तर खऱ्या अर्थानं तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येऊ शकणार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget