एक्स्प्लोर

नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी मिळणार

नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात आता नववी आणि अकरावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्याबाबत नेमकं करायचं काय? याबाबत शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शिक्षण विभागाने आज शासन निर्णय जारी करून हा संभ्रम दूर करत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देत तोंडी परीक्षेची संधी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शक्य नाही. दरम्यान या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आणखी एक संधी शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 7 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या नंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावी व बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करण्यात यावे असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. मात्र, यामध्ये सुद्धा अकरावी व नववीचे अनेक विद्यार्थी यंदा अनुत्तीर्ण झाल्याचे समोर झाले. त्यातच 2018 प्रमाणे होणारी फेरपरीक्षा ही यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक पालकांनी आणि शिक्षक संघटनांनी याचा निषेध करत विद्यार्थ्यांना सरसकट पास करून दहावी व बारावीच्या वर्गात पाठविण्याची विनंती वारंवार करण्यात येत होती. एकीकडे शिक्षण विभागाकडून फेरपरीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय नाही तर दुसरीकडे पालक आणि शिक्षक संघटनांची विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी यामुळे शैक्षणिक संस्थांसमोर ही मोठा पेच उभा राहिला होता. या सगळ्या परिस्थितीचा विचार करत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हे लक्षात घेत शिक्षण विभागाने 7 ऑगस्टपर्यंत शाळांना विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याची सूचना केली आहे.

मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, आजपासून ऑनलाईन नाव नोंदणी, 24 जुलैपासून अर्जविक्री

काही पालकांनी नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा यासाठी ऑनलाईन आंदोलनही केले. पदवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी सरकार धडपडत आहेत. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. मग नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे त्यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आणि या आंदोलनाचा पाठपुरावा केला.

मात्र, यामध्ये 9 वी आणि 11 वी नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा ती पण तोंडी घेण्यासाठी शाळेत बोलवणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. आज मुंबईतील अनेक शाळा कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. दुसरा उपाय व्हिडीओ कॉन्फरन्सने तर अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. काहींकडे नेट पॅक नाही. त्यापेक्षा 9 वी नापास मुलांना थेट दहावीला प्रवेश देऊन प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर त्यांच्याकडून अभ्यास करून घेता येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत त्यांना बोलावू नये, असे मत मुंबई भाजप प्रदेश शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले आहे.

Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
Embed widget