एक्स्प्लोर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माहुलवासीयांचा विसर पडला?

विद्याविहार येथील पाईपलाईनवर वसलेल्या हजारो झोपडपट्टीवासीयांना माहुल गावातील इमारतीत हलवलं. पण रिफायनरीज आणि केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने वेढलेलं माहुल गाव एक गॅस चेंबरच झालं आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना दररोज मरणयातना भोगाव्या लागत आहेत.

मुंबई : सरकारं बदलली, सत्ता वाटपं झाली, नव्या मंत्र्यांना नवं केबिन आणि बंगले सुद्धा मिळाले. पण जगण्याच्या हक्कासाठी लढणारे मुंबईतील माहुलमधील शेकडो कुटुंब आजही रस्त्यावरच आहेत. विद्याविहार येथे सुरु झालेल्या त्यांच्या बेमुदत 'जीवन बचाव आंदोलनाचा' आज 451 वा दिवस आहे. मागच्या युती सरकारमध्ये आदित्य ठाकरेंनी स्वतः याविषयी लक्ष घालून माहुलवासीयांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता पर्यावरण मंत्री झालेल्या बिझी आदित्य ठाकरे यांना या माहुलवासीयांना भेटायलाही वेळ नाही. गेले अनेक दिवस हे प्रकल्पबाधित पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी मंत्रालयाचे खेटे घालत आहेत. "आदित्य ठाकरेंची धावती भेट झाली, परंतु व्यवस्थित बोलणं झालं नाही. त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सूचना दिल्या. परंतु महापालिका प्रशासनाला मध्यमवर्गीयांची काळजी आहे, गोरगरिबांची नाही. आमची घरं तोडून जॉगिंग पार्क बनवलं जात आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. थोडक्यात काय आहे प्रकरण? विद्याविहार येथील पाईपलाईनवर वसलेल्या हजारो झोपडपट्टीवासीयांना माहुल गावातील इमारतीत हलवलं. पण रिफायनरीज आणि केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने वेढलेलं माहुल गाव एक गॅस चेंबरच झालं आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना दररोज मरणयातना भोगाव्या लागत आहेत. यासाठी मागील दोन वर्षे माहुलवासीय कोर्टात, सरकारी कार्यालयात, हरित लवादाकडे आणि रस्त्यावर सातत्याने लढा देत आहेत. दबावाच्या राजकारणात माहुलवासीयांचा राजकारण्यांनी लोणच्यासारखा वापरही केला. मात्र जगण्यायोग्य हवा आणि डोक्यावर छप्पर या मूलभूत गरजांसाठी माहुलवासीय आजही झगडत आहेत. काय आहेत परिणाम? गेल्या दोन वर्षांत प्रकल्पग्रस्त वसाहत आणि माहुल गावात प्रदूषणाने दीडशेहून अधिक बळी घेतले आहेत, 800 हून अधिक लोकांना दुर्धर आजाराने ग्रासले आहे. मृतांचा आकडा दरदिवशी वाढतच चालला आहे. माहुल गावात मरण स्वस्त झालं आहे. सद्यस्थिती! 23 सप्टेंबर 2018 रोजी उच्च न्यायालयाने 12 आठवड्यात माहुल प्रकल्पबधितांचे योग्य पुनवर्सन किंवा प्रत्येक कुटुंबाला मासिक 15 हजार भाडे आणि 45 हजार रुपये अनामत रकमेपोटी द्यावेत असे, आदेश दिले होते. मात्र आदित्य ठाकरेंच्या अश्वासनानंतरही मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. माहुलवासीयांच्या त्वरित मागण्या आहेत की.... 1. मुंबई उच्च न्ययालयाचा माहुल संबंधीचा 23 सप्टेंबर 2019 चा आदेश तातडीने लागू करा. 2. बीएमसीला त्यांची सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती याचिका मागे घेण्याचा आदेश द्या. 3. माहुलमधील 5500 हजार कुटुंबांचं ठराविक वेळ मर्यादा आखून योग्य पुनर्वसन करा. 4. पीडित आणि दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना भरपाई आणि उपचाराची जबाबदारी घ्या. त्यामुळे पशु, प्राणी आणि झाडांवर जीव असलेल्या ठाकरे सरकारने जरा हाडामासाच्या जिवंत माणसाच्या वेदनाही समजून घेऊन जगण्याचा अधिकार द्यावा एवढीच अपेक्षा माहुलवासीयांना या नव्या सरकारकडून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC FDA Drug Inspector Group-B Exam: प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली!
प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली, नेमकं काय घडलं?
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Pimpri-Chinchwad : भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
Embed widget