एक्स्प्लोर

मुंबईच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत रणकंदन

मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

मुंबई : साकीनाक्याजवळ ज्या भानू फरसाणला आग लागली ते अनधिकृत असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर पोलिसांनी त्याच्या मालकाला बेड्याही ठोकल्यात. याच घटनेचा आधार घेऊन विधानसभेत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी लोकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर शिवसेना-भाजपने नसीम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. ज्या कामकाजातून वगळ्यात आल्या. नसीम खान यांनी मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला आणि विधानसभेत भूकंप झाला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारांनी हा मुंबई तोडण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करत आक्षेप नोंदवला. मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव का आला? मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 2014 च्या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 26 लाख आहे. तर लोकसंख्या घनतेत मुंबई पहिल्या नंबरवर. म्हणजे प्रति स्क्वेअर किलोमीटरला 31 हजार 700 इतकी घनता. त्यात मलबार हिल, फोर्टपासून मुलुंडपर्यंत आणि इकडे दहीसरपर्यंत मुंबई अक्राळविक्राळ पसरलीय. त्यामुळे सोईसुविधा आणि त्यांची देखभाल करताना महापालिकेची दमछाक होते. मुंबईत दरदिवशी घडणाऱ्या दुर्घटना आणखी गंभीर आहेत. मुंबईत महिन्याभरात निव्वळ आगीच्या सरासरी 400 ते 450 घटना घडतात. म्हणजे दिवसाला मुंबईत किमान 15 आगी लागतात, त्याचं स्वरुप लहानमोठं असू शकतं. आग वगळता झाड पडणे, समुद्रात बुडण्याच्या किमान 35 घटना रोज घडतात. विभागवार विचार केला तर दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घनतेचा भाग आहे. इथे प्रति चौरस किलोमीटर 45 हजार लोक वावरतात, तर पश्चिम उपनगरात हीच घनता 26 हजार आणि पूर्व उपनगरात 24 हजार इतकी आहे. त्यामुळे त्रिभाजन झालं तर देखभाल, दुरुस्ती आणि सोईसुविधांची उपलब्धता करणं सोपं होऊ शकतं. मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या प्रस्तावावर विचार करावा लागेल, असं म्हटलं आहे. ''ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र प्रस्ताव आणला की लगेच तो लागू करता येत नाही. त्यावर विचार करावा लागेल. साकीनाका दुर्घटनेतील संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल'', असं महापौर म्हणाले. मुंबईत उभं राहायला जागा नाही, चालायला फूटपाथ नाही, प्रवासात बसता येत नाही.  पार्किंगला लॉट नाही. तिथे लोकांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करणं काय चूक आहे? एका महापालिकेच्या तीन महापालिका केल्याने मुंबई महाराष्ट्रापासून कशी तुटेल? भावनिक मुद्दे पुढे करुन मुंबईचा गळा घोटणार का? हा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका; लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने
Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका; लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने
Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
Mumbai Rains Latest Upates: पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget