एक्स्प्लोर

मुंबईच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत रणकंदन

मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

मुंबई : साकीनाक्याजवळ ज्या भानू फरसाणला आग लागली ते अनधिकृत असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर पोलिसांनी त्याच्या मालकाला बेड्याही ठोकल्यात. याच घटनेचा आधार घेऊन विधानसभेत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी लोकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर शिवसेना-भाजपने नसीम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. ज्या कामकाजातून वगळ्यात आल्या. नसीम खान यांनी मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला आणि विधानसभेत भूकंप झाला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारांनी हा मुंबई तोडण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करत आक्षेप नोंदवला. मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव का आला? मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 2014 च्या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 26 लाख आहे. तर लोकसंख्या घनतेत मुंबई पहिल्या नंबरवर. म्हणजे प्रति स्क्वेअर किलोमीटरला 31 हजार 700 इतकी घनता. त्यात मलबार हिल, फोर्टपासून मुलुंडपर्यंत आणि इकडे दहीसरपर्यंत मुंबई अक्राळविक्राळ पसरलीय. त्यामुळे सोईसुविधा आणि त्यांची देखभाल करताना महापालिकेची दमछाक होते. मुंबईत दरदिवशी घडणाऱ्या दुर्घटना आणखी गंभीर आहेत. मुंबईत महिन्याभरात निव्वळ आगीच्या सरासरी 400 ते 450 घटना घडतात. म्हणजे दिवसाला मुंबईत किमान 15 आगी लागतात, त्याचं स्वरुप लहानमोठं असू शकतं. आग वगळता झाड पडणे, समुद्रात बुडण्याच्या किमान 35 घटना रोज घडतात. विभागवार विचार केला तर दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घनतेचा भाग आहे. इथे प्रति चौरस किलोमीटर 45 हजार लोक वावरतात, तर पश्चिम उपनगरात हीच घनता 26 हजार आणि पूर्व उपनगरात 24 हजार इतकी आहे. त्यामुळे त्रिभाजन झालं तर देखभाल, दुरुस्ती आणि सोईसुविधांची उपलब्धता करणं सोपं होऊ शकतं. मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या प्रस्तावावर विचार करावा लागेल, असं म्हटलं आहे. ''ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र प्रस्ताव आणला की लगेच तो लागू करता येत नाही. त्यावर विचार करावा लागेल. साकीनाका दुर्घटनेतील संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल'', असं महापौर म्हणाले. मुंबईत उभं राहायला जागा नाही, चालायला फूटपाथ नाही, प्रवासात बसता येत नाही.  पार्किंगला लॉट नाही. तिथे लोकांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करणं काय चूक आहे? एका महापालिकेच्या तीन महापालिका केल्याने मुंबई महाराष्ट्रापासून कशी तुटेल? भावनिक मुद्दे पुढे करुन मुंबईचा गळा घोटणार का? हा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget