एक्स्प्लोर

मुंबईच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत रणकंदन

मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

मुंबई : साकीनाक्याजवळ ज्या भानू फरसाणला आग लागली ते अनधिकृत असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर पोलिसांनी त्याच्या मालकाला बेड्याही ठोकल्यात. याच घटनेचा आधार घेऊन विधानसभेत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी लोकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर शिवसेना-भाजपने नसीम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. ज्या कामकाजातून वगळ्यात आल्या. नसीम खान यांनी मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला आणि विधानसभेत भूकंप झाला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारांनी हा मुंबई तोडण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करत आक्षेप नोंदवला. मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव का आला? मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 2014 च्या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 26 लाख आहे. तर लोकसंख्या घनतेत मुंबई पहिल्या नंबरवर. म्हणजे प्रति स्क्वेअर किलोमीटरला 31 हजार 700 इतकी घनता. त्यात मलबार हिल, फोर्टपासून मुलुंडपर्यंत आणि इकडे दहीसरपर्यंत मुंबई अक्राळविक्राळ पसरलीय. त्यामुळे सोईसुविधा आणि त्यांची देखभाल करताना महापालिकेची दमछाक होते. मुंबईत दरदिवशी घडणाऱ्या दुर्घटना आणखी गंभीर आहेत. मुंबईत महिन्याभरात निव्वळ आगीच्या सरासरी 400 ते 450 घटना घडतात. म्हणजे दिवसाला मुंबईत किमान 15 आगी लागतात, त्याचं स्वरुप लहानमोठं असू शकतं. आग वगळता झाड पडणे, समुद्रात बुडण्याच्या किमान 35 घटना रोज घडतात. विभागवार विचार केला तर दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घनतेचा भाग आहे. इथे प्रति चौरस किलोमीटर 45 हजार लोक वावरतात, तर पश्चिम उपनगरात हीच घनता 26 हजार आणि पूर्व उपनगरात 24 हजार इतकी आहे. त्यामुळे त्रिभाजन झालं तर देखभाल, दुरुस्ती आणि सोईसुविधांची उपलब्धता करणं सोपं होऊ शकतं. मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या प्रस्तावावर विचार करावा लागेल, असं म्हटलं आहे. ''ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र प्रस्ताव आणला की लगेच तो लागू करता येत नाही. त्यावर विचार करावा लागेल. साकीनाका दुर्घटनेतील संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल'', असं महापौर म्हणाले. मुंबईत उभं राहायला जागा नाही, चालायला फूटपाथ नाही, प्रवासात बसता येत नाही.  पार्किंगला लॉट नाही. तिथे लोकांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करणं काय चूक आहे? एका महापालिकेच्या तीन महापालिका केल्याने मुंबई महाराष्ट्रापासून कशी तुटेल? भावनिक मुद्दे पुढे करुन मुंबईचा गळा घोटणार का? हा प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षाच्या शिक्षेसह 5 लाखांचा दंड, धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला  मंत्रींमंडळाची मंजुरी
जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षाच्या शिक्षेसह 5 लाखांचा दंड, धर्मांतरविरोधी कायद्याच्या प्रस्तावाला  मंत्रींमंडळाची मंजुरी
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Embed widget