एक्स्प्लोर

मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री

मुंबई : कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाचे विराट मोर्चे निघू लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. मराठा समाजाचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवू. त्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा मोर्चात प्रस्थापित मराठा नेत्यांना स्थान नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे. त्याचसोबत शिक्षण आणि सहकार सम्राटांवरही मुख्यमंत्र्यांनी आपला निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चा तसेच अन्य मुद्द्यांवर दूरदर्शनला मुलाखत दिली. "मराठा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधातील मोर्चा" "मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश आहे. बहुतांश मराठा समाजात आजही गरिबी आहे. आर्थिक मागासलेपणा आहे. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधाती मोर्चा आहे", असे मुख्यमंत्री म्हणाले. "मराठा मोर्चांच्या प्रतिनिधींशी चर्चेस तयार" "मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. चर्चेतूनच प्रश्न सोडवू.", असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. "प्रतिमोर्चे काढू नये" "अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने मराठा समाजात संताप आहे. मात्र, मराठा मोर्चा कोणत्याही जातीविरोधातील मोर्चा नाही. त्यामुळे कुणीही प्रतिमोर्चे काढू नये. मोर्चाला प्रतिमोर्चा काढणं योग्य नाही. महाराष्ट्राची सामाजिक घडी बिघडू देऊ नका.", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून केलं. "प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य" या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी मराठा मोर्चावरुन भाजप, संघावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "प्रतिमोर्चा काढून संघाच्या हातचे बाहुले होऊ नये, हे प्रकाश आंबेडकरांचे राजकीय विधान आहे. पण त्यांच्या वक्तव्यातील राजकीय विधान बाजूल ठेवलं, तर त्यांनी 'प्रतिमोर्चे काढू नये', असेही म्हटलं आहे. प्रतिमोर्चा न काढण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य आहे." "मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे" मुख्यमंत्र्यानी मराठा मोर्चांसह मराठा आरक्षणावरही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "आजच्या घडीला सर्वच समाजांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात आर्थिक मागासलेपणा आहे. मात्र, मराठा समाजातही आर्थिक मागासलेपणा आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने गांभिर्याने भूमिका घेतली आहे." त्याचवेळी, आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी, मराठा नेते आणि शिक्षण सम्राटांना टोला मराठा नेत्यांनी केवळ स्वत:ची सोय बघितली, समाजाची नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा नेत्यांवर निशाणा साधला. शिवाय, या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिक्षणसम्राट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असेही मुलाखतीच्या समारोपादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले. मराठा मोर्चा, मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार, मराठा नेते इत्यादी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आपली रोखठोक मतं मांडली. मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीवर आता विरोधकांकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि मराठा मोर्चाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा मुख्यमंत्र्यांची संपूर्ण मुलाखत :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
Rajya sabha Election 2026: राज्यसभेच्या जागा 4 आणि भाजपमध्ये 25 इच्छूक, माधव भंडारींचं नाव पुन्हा चर्चेत, यंदा संधी मिळणार का?
राज्यसभेच्या जागा 4 आणि भाजपमध्ये 25 इच्छूक, माधव भंडारींचं नाव पुन्हा चर्चेत, यंदा संधी मिळणार का?
Online Game : मुलांच्या ऑनलाईन गेमच्या व्यसनावर सरकार गंभीर; तज्ज्ञ टास्क फोर्स स्थापन, पुढील अधिवेशनात अहवाल
मुलांच्या ऑनलाईन गेमच्या व्यसनावर सरकार गंभीर; तज्ज्ञ टास्क फोर्स स्थापन, पुढील अधिवेशनात अहवाल
FDA : अन्न आणि औषध प्रशासन विभागातील गैरकारभाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे; अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील गैरकारभाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे; अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी

व्हिडीओ

Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: मोकाट वळूचा हैदोस! शिंगाने आपटलं, पायाने तुडवलं; नागपुरात ज्येष्ठ महिलेची गेल्या महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज, प्रशासनाकडून साधी विचारणाही नाही
मोकाट वळूचा हैदोस! शिंगाने आपटलं, पायाने तुडवलं; नागपुरात ज्येष्ठ महिलेची गेल्या महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज, प्रशासनाकडून साधी विचारणाही नाही
Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
Nanded Crime: लग्नासाठी तगादा, नकार देताच मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भीतीपोटी दहावीतील विद्यार्थिनीच टोकाचं पाऊल; नांदेड हादरलं!
लग्नासाठी तगादा, नकार देताच मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भीतीपोटी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच टोकाचं पाऊल; नांदेड हादरलं!
Team India semi final Scenario : 75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना की, विजय देवरकोंडा कोणाची कमाई सर्वाधिक? दोघांचं नेटवर्थ किती?
रश्मिका मंदाना की, विजय देवरकोंडा कोणाची कमाई सर्वाधिक? दोघांचं नेटवर्थ किती?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
Embed widget