एक्स्प्लोर

अर्नाळ्यात पकडलेल्या बांगलादेशींकडे जन्माचा दाखला

पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने ही कारवाई केली होती. यामध्ये दोन बांगलादेशी नागरिकांचा जन्माचा दाखला अर्नाळा ग्रामपंचायतीचा असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.

मुंबई : अर्नाळ्यात पकडलेल्या 23 बांगलादेशींपैकी दोघांकडे अर्नाळा ग्रामपंचायताचा जन्माचा दाखला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जन्माचा दाखला कशाच्या आधारावर दिला आहे, याचा खुलासा पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे मागितला आहे. पण जुने रेकोर्ड खराब असल्याचे सांगत ग्रामसेवकांनी हात वर केले आहेत. 12 फेब्रुवारी रोजी विरारच्या अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत 23 बांगलादेशींना अवैद्य वास्तवप्रकरणी अटक केली होती. पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने ही कारवाई केली होती. या अटक 23 बांगलादेशी पैकी 2 बांगलादेशी नागरिकांचा जन्माचा दाखला अर्नाळा ग्रामपंचायतीचा असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.  परविना अकरा गाजी, रफीकुल मेसार गाजी या दोन अटक बांगलादेशीयांचे अर्नाळा ग्रामपंचायतने दिलेले दाखले आहेत. Bangladeshi immigrants | दोन हजारात बांगलादेशी 'भारतीय' होतो; मुंबई, ठाण्यात घुसखोरांचे अड्डे | स्पेशल रिपोर्ट या दाखल्यातील परविना यांची जन्म तारीख 7 ऑगस्ट 1975 अशी आहे आणि यांना 16 जानेवारी 2008 ला जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर याची नोंदणी 15 ऑगस्ट 1975 ला करण्यात आली असून नोंदणी क्रमांक 01 आहे. तर राफीकुल यांचा जन्म 20 जून 1973 असून 25 ऑगस्ट 1973 लाच याची नोंदणी करण्यात आली आहे. याचा नोंदणी क्रमांक 11 आहे.  29 जानेवारी 2007 ला जन्म प्रमाणपत्र अर्नाळा ग्रामपंचायतने दिले आहे. आता या प्रकरणात पोलीसांनी अर्नाळा ग्रामपंचायतीकडून जन्म प्रमाणपत्र मिळाल्याचा खुलासा  मागितला आहे. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यान्वये असे नोंदणी पत्र आले तर त्याची नोंदणी करावी लागते. पण त्या काळात कोणत्या आधारावर नोंदणी केली, हे आम्ही पाहत आहोत. पण 2007-2008 चे रेकॉर्ड खराब झाल्याने ते मिळेलच का नाही याची शाश्वती मात्र ग्रामसेवक देत नाहीत. याबाबत अर्नाळा सागरी पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. संबंधित बातम्या : मनसेने पकडून दिलेले 'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार भारताने घुसखोर बांगलादेशींची यादी द्यावी, आम्ही त्यांना मायदेशी बोलावू : बांगलादेश

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget