एक्स्प्लोर

Jitendra Awhad on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, पण... : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : राम यांची पर्सनल प्रॉपर्टी नाही, निवडणुका जवळ आल्या की, यांनी रामाचा बाजार मांडला आहे, हे मागील 70 वर्ष सुरू आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Jitendra Awhad on Ajit Pawar : मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री (Chief Minister) झाले तर आनंद होईल, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. राजकीय वैमनस्य नसतं, वैचारिक मतभेद असतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवं, आपलं वैर नाही शेतीमातीचं भांडण नाही, असं ते म्हणाले आहेत. तसेच, आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही, त्यामुळे आम्हाला निधी दिला जात नाही, अशा पद्धतीनं वागवलं जातंय आम्हाला. एक रुपयाचा निधीही आम्हाला दिलेला नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना आव्हाडांनी राम मंदिराबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले की, "राम यांची पर्सनल प्रॉपर्टी नाही, निवडणुका जवळ आल्या की, यांनी रामाचा बाजार मांडला आहे, हे मागील 70 वर्ष सुरू आहे."

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, "तीन राज्यांच्या निवडणुकांनंतर भाजप मधल्या कार्यकर्त्यांचं मत झालं आहे की, आता आपण कशाला कुणाचा आधार घ्यायचा. आपल्या फोडाफोडीमुळे जनता नाराज आहे. आपल्या वैचारिक आजारावर जनता जर आपल्या सोबत असेल, तर कशाला इतरांना सोबत घ्यायचं, अशी भावना आहे. त्यांचा कोर व्होटर दुसऱ्याला सोबत घेतलं की, नाराज होतो, याच उदाहरणं म्हणजे, पुण्याची निवडणूक आहे. तिथं कोर व्होटर नाराज झाला आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर निवडून आले."

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल : जितेंद्र आव्हाड 

"अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल. राजकीय वैमनस्ये नसतं वैचारिक मतभेद असतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवं आपलं वैर नाही शेतीमातीचे भांडण नाही. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही, त्यामुळे आम्हाला निधी दिला जात नाही, अशा पद्धतीनं वागवला जात आहे. आम्हाला एक रुपया निधी देखील दिला नाही.", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्हाला मुख्यमंत्री यांनी निधी वाटपासाठी वेळ दिला, पण तो लॉबीत दिला. विरोधी पक्षाची लायकी लॉबीत आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. चाळीस वर्ष ज्यांनी विधिमंडळात काम केलं, त्यांना निरोप आला की, लॉबीत येऊन भेटा."

राजीव गांधी गेले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं : जितेंद्र आव्हाड 

"या उलट काँग्रेसची संस्कृती पाहीची म्हटलं तर एक उदाहरण घेता येईल, अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते असताना आजारी पडले होते आणि त्यांना ऑपरेशनसाठी अमेरिकेला जायचं होतं. परंतु, त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करायला सांगितलं आणि त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांचे पूर्ण उपचार केले. ज्यावेळी राजीव गांधी गेले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, त्यांनी स्वतः आपल्या भाषणात हा किस्सा सांगितला होता.", असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

"आपण ज्यावेळी एक असतो, त्यावेळी निर्णय एक व्हायला हवा. ज्यावेळी आपण जेवायला बसतो, त्यावेळी आपल्याबरोबर असणाऱ्याला काहीच मिळालं नाही आणि त्यावेळी आपण भरपेट जेवणं हे माणुसकीला धरून नाही.", असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.  

"मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आयुक्तांना अनधिकृत बांधकामा संदर्भात फोन केला, असं म्हटलं आहे. मात्र, माझा प्रश्न हा आहे की, ठाण्याचे महापालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांचं ऐकणार का? मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि आयुक्तांनी ऐकलं नाही तर तुम्ही काय करणार आणि मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, हे आयुक्त नाकारू शकत नाही. कारण तो फोन माझ्यासमोर केला होता. त्यांनी हे देखील सांगितलं की, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अटक करा.", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Navi Mumbai foreigner died: मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Embed widget