एक्स्प्लोर

Today In History : माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचं निधन, चौधरी चरण सिंह यांचा जन्म, इतिहासात आज

23 December In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत.

What Happened on December 23th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. भारतात 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठाची (Visva-Bharati University)स्थापना आजच्याच दिवशी झाली.  तसेच आजच्या दिवशी देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे निधन झालं होतं.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

2004- पी व्ही नरसिंह राव यांचे निधन 
देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिह राव (P.V. Narasimha Rao) यांचे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले. राजीव गांधी यांच्या निधनानंतर देशात पन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले.  1991 ते 1996 या दरम्यान ते देशाचे नववे पंतप्रधान होते. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, देशावर आर्थिक संकट आलं असताना त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले. आज जो काही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दिसतोय त्यामध्ये पी व्ही नरसिंह राव यांचे महत्त्वाचे योगदान होतं. 

1902- भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्म 

चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1979 साली ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले. चौधरी चरण सिंह यांना वाचणाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केलं. 

2019- पत्रकार जमाल खाशोगी हत्याप्रकरणात पाच लोकांना मृत्यूदंड 
अमेरिकन नागरिक आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये कॉलम लिहिणारे पत्रकार जमाल खाशोगी (Jamal Khashoggi) यांची हत्या करणाऱ्या पाच जणांना 23 डिसेंबर 2019 रोजी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या प्रकरणात अमेरिकेने यू टर्न घेत सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान (Saudi Crown Prince Mohammed bin Salman) यांची मुक्तता केली.

वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात जमाल खाशोगी हे सौदी अरबवर एक कॉलम लिहायचे. आपल्या लेखनातून त्यांनी सौदी अरबचे राज्यकर्ते आणि राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर टिका केली होती. खाशोगी हे जेव्हा इस्तंबुलमधील गेले तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 2018 साली घडली होती. खाशोगी यांच्या हत्येचा थेट संशय सौदी अरबचा राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर व्यक्त करण्यात येत होता. इस्तंबुलमध्ये खाशोगींची हत्या करण्यात आली होती ती मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरुनच करण्यात आली होती, असं अमेरिकेने आधी म्हटलं होतं. मात्र आता सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना बायडेन प्रशासनाकडून जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी खटल्यातून मुक्तता करण्यात आली. 

1921- विश्व भारती विद्यापीठाची स्थापना 
पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठाची (Visva-Bharati University)स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 23 डिसेंबर 1921 रोजी झाली. हे विद्यापीठ देवेंद्रनाथ टागोर (Rabindra Nath Tagore) यांनी 1863 मध्ये स्थापन केलेल्या शांतिनिकेतन आश्रमातून विकसित झाले. 1901 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे आश्रम विद्यालय सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यापीठ उभं राहिलं. भारतीय संसदेच्या कायद्यान्वये 1951 साली या विद्यापीठाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. हे विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. 

1922- बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू
आजच्याच दिवशी म्हणजे 23 डिसेंबर 1922 रोजी बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू झाले. 

1926- स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या 
सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आणि समाजसुधारक आणि सामाजिक चळवळीचे नेते स्वामी श्रद्धानंत यांची 23 डिसेंबर 1926 रोजी हत्या करण्यात आली. स्वामी श्रद्धानंद, ज्यांना महात्मा मुन्शी राम विज म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि आर्य समाज संन्यासी होते. त्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या शिकवणींचा प्रचार केला. यामध्ये गुरुकुल कांगरी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेचा समावेश होता आणि 1920 च्या दशकातील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये संघटना आणि शुद्धीकरण चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

1998- देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे निधन
देशभक्त रत्नाप्पा कुंभार (Ratnappa Kumbhar) यांचे निधन 23 डिसेंबर 1998 रोजी इचलकरंजी या ठिकाणी झाले. रत्नाप्पांचा जन्म 15 सप्टेंबर 1909 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.

रत्नाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील 21 संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत सहा वेळा निवडून गेलेले आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते 1985 साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली. 

2000- प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका ‘मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहां यांचं निधन
चाळीसच्य दशकात आपल्या अभिनयाने आणि गायकीने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नूरजहां यांचं निधन 23 डिसेंबर 2000 रोजी झालं. नूरजहांला 'मलिका ए तरन्नुम' (MALIKA-E-TARANNUM Noor Jehan )असं म्हटलं जायचं. खानदान, दोस्त, झीनत, गाव की गोरी ,बडी मां आणि जुगनू या चित्रपटातून त्यांनी अभिनय आणि गायन केलं होतं. 'जवां है मुहोब्बत हंसी है जमाना', 'आवाज दे कहां है दुनिया मेरी जवां है…' या त्यांच्या गाण्याने रसिकमनांना वेड लावलं होतं. फाळणीनंतर नूरजहां पाकिस्तानमध्ये गेल्या. 

2000- कलकत्त्याचं नाव बदलून कोलकाता केलं
पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता या शहराचं नाव 23 डिसेंबर 2000 रोजी बदलवण्यात आलं आणि ते कोलकाता असं ठेवण्यात आलं. 

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget