एक्स्प्लोर

Coronavirus | घरात, ऑफिसमध्ये एसी कमीत कमी वापरा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सल्ला

थंड वातावरणात कोरोना विषाणूंचं आर्युमान जास्त असतं. याशिवाय एसीच्या हवेतून कोरोनाचे विषाणून जास्तीत जास्त पसरु शकतात, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबई : कोरोनाच्या विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे हा धोका पाहता कार्यालय आणि घरातील एसीचा वापर कमी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. या संदर्भात राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. एसीच्या वापरावर सरकारने काही मर्यादा घालण्याचं आवाहन केलं आहे.

थंड वातावरणात कोरोना विषाणूंचं आर्युमान जास्त असतं. याशिवाय एसीच्या हवेतून कोरोनाचे विषाणून जास्तीत जास्त पसरु शकतात. त्याद्वारे इतरांच्या नाका-तोंडावाटे हे विषाणू शरीरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसी ऐवजी फॅनला जास्त प्राधान्य द्यावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. कडक उन्हामध्ये हे विषाणू फार काळ टिकत नाहीत.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वरुन 63 वर

राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे.

नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

...तर लोकल सेवा बंद करावी लागेल

मुंबई, पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. लोकं कामानिमित्त बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लोकं बाहेर पडणार नाहीत यासाठी, काही सेवा बंद करण्यावर सरकारने भर दिला. गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल सेवा बंद करावीच लागेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टेस्टिंग लॅब्स वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्य सरकार मेडिकल कॉलेजमध्येही लॅब्स उभारण्यास तयार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना याबाबत विनंती केली आहे. राज्यात लॅब्स वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

  • पिंपरी चिंचवड मनपा - 12
  • पुणे मनपा - 10
  • मुंबई - 21
  • नागपूर- 4
  • यवतमाळ - 3
  • नवी मुंबई - 3
  • कल्याण - 3
  • अहमदनगर - 2
  • रायगड - 1
  • ठाणे - 1
  • उल्हासनगर - 1
  • औरंगाबाद - 1
  • रत्नागिरी - 1
संबंधित बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget