एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : रिफायनरीसाठी केंद्रांचा पाठपुरावा ते राजन साळवींचं समर्थन; उद्वव ठाकरे नेमकं काय बोलले?

Mumbai News : सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचा विषय मागे सरला आहे. पण,  निवडणुकीच्या (Election 2024) तोंडावर या भागातील स्थानिक काय भूमिका घेणार हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

Konkan Refinery : सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचा विषय मागे सरला आहे. पण,  निवडणुकीच्या (Election 2024) तोंडावर या भागातील स्थानिक काय भूमिका घेणार हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान, कोकणातील रिफायनरी प्रकल्प आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका याबाबत देखील चर्चा झाली. चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी राजापूर तालुक्यातील बारसू या ठिकाणी प्रकल्प करण्यासाठी केंद्राकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. प्रकल्प चांगला आहे. राज्याला त्याचा फायदा होईल, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला होता. शिवाय, स्थानिक आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी प्रकल्पाचे समर्थन करावे यासाठी त्यांना पक्षाकडूनच आदेश दिले गेले होते, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी या चर्चेवेळी दिली. 

रिफायनरीचं समर्थन केल्यामुळे स्थानिक आमदार राजन साळवींना (Rajan Salvi) मोठ्या रोषाचा सामना करावा लागला होता. उद्धव ठाकरेंनी रिफायनरी विरोधकांची भेट घेतली त्यावेळी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली होती. शिवाय, साळवींची भूमिका पाहता त्यांच्याविरोधात रोष देखील दिसून येत होता. पण, आता साळवी यांना पक्षानेच आदेश दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

साळवींना बदललेल्या भूमिकेमागील कारण उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं

नाणार या ठिकाणी असलेली रिफायनरी रद्द झाली. त्यानंतर बारसूमध्ये रिफायनरी होणार, अशी चर्चा होती. त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र देखील समोर आलं. या सर्व घडामोडी घडत असताना स्थानिक आमदार राजन साळवींनी रिफायनरी समर्थनार्थ विधानं केली. परिणामी त्यांच्याविरोधात रिफायनरी प्रस्तावित असलेल्या गावांमध्ये रोष दिसून आला. आंदोलनादरम्यान साळवींचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, त्यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा देखील काढली गेली. रिफायनरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर उद्धव ठाकरेंनी या भागाचा दौरा केला. त्यावेळी सोलगाव फाट्यावर त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. पण, साळवींना बदललेल्या भूमिकेमागील कारण आता थेट उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 

माती परिक्षणाचं काय झालं? 

रिफायनरीसाठी जागा निश्चित करत असताना बारसुच्या सड्यावर माती परिक्षण केलं गेलं. त्यावेळी मोठ्ठं आंदोलन झालं. शिवाय, याच आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं. पण, अद्याप तरी माती परिक्षणाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे रिफायनरीचं भवितव्य नेमतं काय? असा सवाल आता निर्माण झाला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखतीMumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाMahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget