एक्स्प्लोर

आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कमी आहे, शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरवठा करु, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.

रायगड : आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कमी आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना लगावला आहे. 'महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही', अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर पवारांनी उत्तर दिलं. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. महाराष्ट्रावरचं हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये, असंही पवार म्हणाले.

'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे जे नुकसान झालं आहे ते खूप जास्त आहे. यावेळी दुहेरी संकट आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत, व्यवसाय थांबले आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.

सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल. आधी राज्यात पाठपुरवठा करु आणि आवश्यकता लागली तर दिल्लीत जाऊन देखील पाठपुरवठा करु, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली. लवकर पंचनामे झाले पाहिजेत. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. महाराष्ट्रावरचं हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये. सगळ्यांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत केली पाहिजे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.

आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कमी आहे, शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

कोकणातील फळबाग शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नारळ, काजू , आंबा, सुपारी या फळबागा येथे आहेत. नारळ, सुपारीची पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. उद्ध्वस्त झालेल्या नारळ बागा पुन्हा उभ्या राहायला पुढची 10 वर्ष जातील. शेती पूर्ववत करायला मोठा खर्च करावा लागेल. राज्य सरकार आणि केंद्राने मदत करण्यासाठी आवश्यक धोरण ठरवणे गरजेचं आहे. मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोना आणि वादळामुळे दुहेरी फटका बसल्याने त्यासाठी वेगळं पॅकेज देणं आवश्यक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.

केंद्र सरकार आणि राज्याला सांगून मदत घ्यावी लागेल. छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणं आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम याठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. पाणीपुरवठा लवकर सुरू केला पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar | शरद पवारांकडून म्हसळा गावातील मदरशाची पाहणी

महत्त्वाच्या बातम्या

पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
Embed widget