एक्स्प्लोर

अनेक गोष्टीप्रमाणे लालबागचा राजाही हे लोक गुजरातला नेऊ शकतात; गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी अमित शाहांवर निशाणा साधलाय.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. त्यांनी यावं, मात्र मला सारखी भीती वाटते आहे की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) देखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला आहे. कारण हे लोक काहीही करू शकतात. एकीकडे लालबागचा गणपती प्रख्यात आहे. देश विदेशातून लोक तेथे येत असतात. त्यामुळे लालबागचा राजा हे गुजरातला देखील घेऊन जातील, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून पुढील दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधत टीका केली आहे.

महाराष्ट्राची जनता गृहमंत्ऱ्याना महाराष्ट्राचा शत्रू मानते

राज्यातील अनेक प्रकल्प, व्यापार, उद्योग आणि महत्त्वाची केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. आज ते देशाचे गृहमंत्री आहत,  मात्र ते कमजोर गृहमंत्री आहेत. एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. तर देशात जम्मू-काश्मीर, मणिपूर असेल किंवा देशातील  इतर भाग असतील इकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार याला त्यांचा पाठिंबा आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी सारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे हे एका गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुबळा करायचा त्यांच्या प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ते वारंवार महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शत्रू मानते. असेही संजय राऊत म्हणाले. 

गृहमंत्र्यांच्या कामाची इतिहासात नोंद होईल

मी अतिशय विचारपूर्वक बोलत असून हे लोक व्यापारी लोक आहेत. महाराष्ट्राला हे लोक दुश्मन मानतात. तसेच बरेचसे राज्य असे आहेत जे यांना लुटायचे आहेत. मात्र गृहमंत्र्यांचे काम आहे की सर्वांना समान न्याय द्यावा. कायदा सुव्यवस्था राखवं, मात्र त्यांचे काम पक्ष फोडणे, एकमेकांवर दबाव टाकणे, न्यायालयावर दबाव टाकणे, इत्यादी कामे गृहमंत्र्यांची नाही. त्यांच्या या कामाची इतिहासात नोंद होईल. महाराष्ट्र लुटण्यासाठी, तोडण्यासाठी ते वारंवार महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा त्यांच्या डोळ्यात खूपत आहे.

गेल्या लोकसभेत राज्यात जे निकाल हाती आले, जनतेने जो कौल दिला आहे, हे बघता त्यांना महाराष्ट्र अधिक कुमकुवत करायचा आहे. म्हणूनच ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाही आहे. खरंच यांच्यात हिंमत असेल तर हरियाणा सोबत राज्याच्या निवडणुका घेतल्या पाहिजेल. असा घनाघातही संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोलUjjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहितीABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सAnil Parab vs Fadnavis : शिंदेंसारखे मुंबई रस्त्यावर उरुन डीप क्लिनिंग करणार का? परबांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मेपासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मेपासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
Embed widget