एक्स्प्लोर

Ranjit Savarkar: काँग्रेस, गांधी अन् नेहरुंवर थेट टीका; रणजित सावरकरांशी माझा कट्ट्यावरील संवादातील दहा महत्वाचे मुद्दे

रणजित सावरकर यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी रणजित सावरकर यांनी अनेक दावे करत काँग्रेस, महात्मा गांधी, पंडित नेहरुंवर टीका केली आहे.

Ranjit Savarkar On Majha Katta:  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swatantraveer savarkar) नातू रणजित सावरकर हे नेहमीच त्यांच्या थेट बोलण्यामुळं आणि दाव्यांमुळं चर्चेत असतात.  याच रणजित सावरकर यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी रणजित सावरकर यांनी अनेक दावे करत काँग्रेस, महात्मा गांधी, पंडित नेहरुंवर टीका केली आहे. ज्यावेळी सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने विचार करत होते, असं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.  स्वातंत्र्यांच्या क्रांतिकार्यात सहभागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पोलीसांच्या फाईलमध्ये दफन झालेले सगळे जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा, सत्य समोर येईल असाही दावा रणजित सावरकर यांनी केला आहे. नेहरुंनीच फाळणी मान्य केली असल्याचा दावा देखील रणजित सावरकरांनी केला. सावरकर अखंड भारतासाठी भांडत होते, असंही ते म्हणाले.

एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात रणजित सावरकरांचे दहा महत्वाचे मुद्दे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्यांच्या क्रांतिकार्यात सहभागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पोलीसांच्या फाईलमध्ये दफन झालेले सगळे जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा, सत्य समोर येईल

ज्यावेळी सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने विचार करत होते.
  
महात्मा गांधीचे प्राण वाचवण्यासाठी काँग्रेस कशी अपयशी ठरले हे कपूर कमिशनच्या अहवालात दिलं आहे. 

सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही. त्यांनी लिहिलेला अर्ज हा सुटकेचा नव्हताच. तर त्यांनी कैद्यांना असलेल्या नियमांविषयी ते पत्र लिहिलं होतं. 

प्रत्येक अर्जात सावरकरांनी शेवटी असं म्हटलंय की, मला सोडलं नाही तरी चालेल मात्र इतरांना सोडा. 

ब्रिटीश देखील म्हणायचे की, सावरकर इतके महत्वाचे नेते आहेत की त्यांना जर तुरुंगाच्या बाहेर अंदमानात पाठवलं तर त्यांचे क्रांतिकारक बोट भाड्यानं घेऊन पळवून नेतील. भारतातील कुठलाही तुरुंग त्यांना ठेवायला सक्षम नाही, असं ब्रिटीशांनी म्हटल्याचे ऑनरेकॉर्ड पुरावे आहेत

 ब्रिटीश लोकं सावरकरांच्या अर्जाला माफीनामा म्हणत नाहीत, आपलेच लोकं त्याला माफीनामा म्हणत आहेत. 

फाळणीवरुन सावरकरांवर आरोप केला जातो, मात्र त्यासंदर्भातले खरे दोषी नेहरुच आहेत आणि त्यांनीच फाळणीनंतर होणाऱ्या रक्तपाताची पूर्ण कल्पना असतानाही निर्णय घेतले.

गांधींचा जातिभेदावर विश्वास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती. 

काँग्रेसने अधिकृत भूमिका घेतली की ब्रिटीशांविरुद्ध कोणतंही आंदोलन करायचं नाही. गांधींनी स्वताही काही केलं नाही आणि एका संघटनेचं आंदोलन स्थगित केलं. 12 फेब्रुवारी 1922 रोजी काँग्रेस कार्यकारिणीचा असा ठराव आहे. त्याची कागदपत्रं आहेत. 1922 ते 1931 पर्यंत सगळी आंदोलनं बंद केली.

ही बातमी देखील वाचा

क्रांतिकार्यातील सावरकरांच्या सहभागाबद्दल जर जाणून घ्यायचंय तर जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा : रणजित सावरकर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Embed widget