एक्स्प्लोर
...तर आम्ही अल्पमतातलं सरकार बनवू; रामदास आठवलेंचा शिवसेनेला इशारा
शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली : शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत चर्चादेखील करायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, आमच्याकडे (शिवसेना सोडून भाजप आणि मित्रपक्षांकडे) सध्या 120 आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेना आमच्या सोबत आली नाही तर आम्ही 120 आमदारांच्या संख्याबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करु. त्यासाठी 25 आमदारांचा पाठिंबादेखील मिळवू. हे अल्पमतातलं सरकार आम्ही पाच वर्ष चालवून दाखवू. अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे, ते एबीपी माझाशी बोलत होते. आठवले म्हणाले की, राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महायुतीसाठी मतदान केलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी राज्यातील जनतेच्या मताचा आदर करावा. त्यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. आठवले म्हणाले की, शिवसेनेने त्यांची आडमुठेपणाची भूमिका सोडत मुख्यमंत्रीपदाची मागणी करणं थांबवावं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावं. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. परंतु 50-50 चा फॉर्म्युला म्हणजेच एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्यााला उपमुख्यमंत्रीपद असा होतो. दरम्यान, जरी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केलं तरी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा आठवले यांनी यावेळी केला.
पाहा काय म्हणाले रामदास आठवले?
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















