एक्स्प्लोर
खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची राज ठाकरेंकडून खिल्ली

मुंबईः दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो म्हणजे दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची खिल्ली उडवली. यूपीएससी आणि एमपीएससी परिक्षेमध्ये यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी खडसेंवर आरोप असलेल्या कथित दाऊद फोन कॉल प्रकरणावरून त्यांना तिरकस टोला लगावला. दाऊद पाकिस्तानातून स्वतःची यंत्रणा सांभाळतो आणि तो खडसेंना फोन करेन का, एवढी वाईट वेळ त्याच्यावर कशी आली, अशा शब्दात राज यांनी खिल्ली उडवली. आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्क वितर्क लावले जातात, मात्र त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे, असं राज यांनी सांगितलं.
Before You Go
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















