एक्स्प्लोर

लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरु होणार

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी आणि मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. यासाठी रेल्वेची मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मध्य आणि दक्षिण-मध्य विभागातून काही गाड्यांमधून मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्यात येईल.

उस्मानाबाद : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ट्रेन बंद झाल्या आणि अनेक जण अडकून पडले. या अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. 13 एप्रिल रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये विविध ठिकाणी अडकलेले लोक, स्थलांतरित मजूर यांना आपापल्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्याचं ठरवण्यात आलं.

लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरु होणार

दक्षिण-मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण

मात्र अशी कुठलीही विशेष ट्रेन चालवली जाणार नसल्याचं दक्षिण-मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे. हे पत्र रेल्वेचा अंतर्गत व्यवहार होता. मात्र सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झालं आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांचे, स्थलांतरित मजुरांचे अतिशय हाल होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील लॉकडाऊन 16 दिवस वाढल्याने हातावर पोट असणारे मजूर चिंताग्रस्त आहेत. काम नाही तर दाम नाही. दाम नाही तर रोटी नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. काही ठिकाणी लोकांनी मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. काहींनी चालत, बाईकवर, कंटेनरमधून, दुधाच्या टँकरमधून आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. ट्रेन बंद झाल्याने मुंबईतील कुर्ला टर्मिनसमवर अनेक प्रवासी अडकले. तर दिल्लीत बस स्टॅण्डवर तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी आणि मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. यासाठी रेल्वेची मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मध्य आणि दक्षिण-मध्य विभागातून काही गाड्यांमधून मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्यात येईल.

महाराष्ट्रातून कोणत्या विभागातून रेल्वे धावणार? महाराष्ट्रातील मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे या दोन विभागांचा समावेश आहे. नांदेड विभागातून 20 गाड्या मागितल्या आहेत. औरंगाबादमधून तीन हजार मजूर पाठवणार आहेत. हे लॉकडाऊनमधील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरेल.

*मध्य रेल्वे विभाग* मुंबई सीएसएमटी पुणे विभाग (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) सोलापूर (अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, मनमान, सोलापूर) भुसावळ (भुसावळ, खांदवा, जळगाव, अकोला, अमरावती, नाशिक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे) नागपूर (वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वणी)

*दक्षिण-मध्य रेल्वे विभाग* नांदेड (नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, हिंगोली, वाशिम, अकोला, मुखेड)

*कसा असेल प्रवास?* यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. समजा लखनौला जाणारे मजूर असतील तर ते मजूर त्या डब्यात बसवले जातील, त्या डब्यांना बाहेरुन कुलूप लावले जाईल आणि हा डबा थेट लखनौला उघडेल, खिडक्या उघड्या असतील. मात्र आतमधून बाहेर पडता येणार नाही.

(ही बातमी सकाळी 9 वाजता प्रसारित झालेल्या बुलेटिनमधील बातमीचं टेक्स्ट व्हर्जन आहे.) India Lockdown | शहरात अडकून पडलेल्या मजुरांसाठी ट्रेन सुरु होणार?

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Embed widget