एक्स्प्लोर

Kolhapur Worst Road : कोल्हापुरात 15 दिवसांमध्येच 'पॅचवर्क' उखडले; या 'दगडी' कारभाराचं करायचं तरी काय? 

Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या भयानक अवस्थेवर मलमपट्टी म्हणून पॅचवर्क हाती घेण्यात आले. मलमपट्टी पॅचवर्कचा दर्जाच किती महाभयंकर आहे याचा अनुभव दररोज येत आहे.

Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या भयानक अवस्थेवर मलमपट्टी म्हणून पॅचवर्क हाती घेण्यात आले. मलमपट्टी पॅचवर्कचा दर्जा किती महाभयंकर आहे याचा अनुभव दररोज येत आहे. करण्यात आलेल्या पॅचवर्कच्या खडीने दररोज अपघाताला निमंत्रण मिळत आहे. उडणाऱ्या धुळीने डोळ्यांचे विकारही सुरु झाले आहेत. असे असतानाच सुभाष रोड ते हाॅकी स्टेडियम रोड जोडणाऱ्या चौकात महाकाय असा खड्डा पडला होता. या खड्ड्यात अवघ्या 15 दिवसांपूर्वी पॅचवर्क करण्यात आले होते. मात्र, ते आता पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे या कामातून नेमके कोणाचे वडाप सुरु आहे आणि कोणाची उखळं पांढरी होत आहेत? असाच प्रश्न उपस्थित होतो.

संबंधित पॅचवर्कचे ठेकेदाराकडून करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. नेत्रदीप सरनोबत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, संबंधित मार्गावर ड्राय बेस घेऊन खडी मारली आहे. दोन लेअर मारून झाकून घेण्यास सांगितले आहे. ड्राय बेसवर तातडीने लेअर घ्यायला हवी, पण ते करत असताना मंजूरी नसतात, बजेट नसते त्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. 

उपायुक्तांनी पॅचवर्कची पाहणी केली की नाही?

दरम्यान, ठेकेदारांकडून तसेच महापालिकेकडून होत असलेल्या कामाची पॅचवर्क कामाची पाहणी महापालिकेतील उपायुक्तांकडून होत आहे. त्यामुळे या पॅचवर्कची पाहणी उपायुक्तांकडून झाली असेल, तर कोणत्या धर्तीवर पाहणी केली? त्यासाठी काय निकष ठरवण्यात आले होते. इंडियन रोड मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आणि बांधणीच्या निकषांची माहिती ठेकेदारांना देण्यात आली होती की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.  

ठेकेदाराच्या कामाची पाहणी केली होती की नाही? याबाबत नेत्रदीप सरनोबत यांना विचारण्यात आले असता त्यांनी केली असेल, असे मोघम उत्तर दिले. मात्र, सरनोबत यांनी टेक्निकल लोकांना नाॅन टेक्निकल काम आणि नाॅन टेक्निकल लोकाना टेक्निकल काम दिलं जात असल्याचे सांगितले. असे असेल, तर अधिकारी पाहणीची जबाबदारी का घेतात? असाही प्रश्न उपस्थित होतो. तटस्थ यंत्रणेमार्फत पाहणीचे काम का करून घेतले जात नाही? याबाबत आता विचार करण्याची गरज आहे. पॅचवर्क खराब झाल्याने ठेकेदारावर काही कारवाई होणार का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सरासरी 30 टक्के खड्डे गृहित धरून ते भरण्यासाठी 60 ते 70 कोटी रुपयांची गरज असल्याचे नेत्रदीप सरनोबत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.