एक्स्प्लोर

शिवस्मारकाच्या निविदांमध्ये गैरव्यवहार नाही : अशोक चव्हाण

गेल्या पाच वर्षात तत्कालीन सरकारने शिवस्मारकाच्या प्रकल्पाला गती दिलेली नाही. गेल्या सरकारने सगळ्यांना अंधारात ठेऊन घाईघाईने आणि चुकीच्या पद्धतीने या स्मारकासंदर्भात निर्णय घेतले असा आरोप चव्हाण यांनी केला

मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदांमध्ये गैरव्यवहार झालेला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र काही चुकीच्या पद्धतीने घेतलेले निर्णय दुरुस्त करण्याची गरज आहे, असं अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.  भाजप सरकार असताना वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात घोटाळा झाल्यांची बोंब होत असे. आज स्मारकाचा विषय विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात चर्चेला आला यावेळी याबबात बोलताना अशोक चव्हाण यांनी शिवस्मारकांच्या निविदांमध्ये गैरव्यवहार नसल्याचे सांगितले. कंत्राटाची किंमत 2 हजार 581 कोटींसह जीएसटी अशी निश्चित करण्यात आली. त्यामुळे या निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तत्कालीन सरकारने लार्सन अँड टूबरो कंपनीशी वाटाघाटी करुन स्मारकाच्या कंत्राटाची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत कमी केल्याचं दाखवून स्मारकाच्या मूळ संरचनेत बदल केला आहे का? असा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेच्या हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण बोलत होते. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबत तातडीनं सुनावणीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात लार्सन अँड टूबरो कंपनीशी वाटाघाटीच्या नावाखाली निविदा काढल्यानंतर अनेक बदल केले गेले. स्मारकाच्या मूल्य निर्धारणात  500 ते 1000 कोटी रुपयांचा फरक दिसत आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात महालेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे किंमतीतला फरक योग्य की अयोग्य या संदर्भात सरकार बारकाईने लक्ष घालत आहे असं त्यांनी सांगितलं. या स्मारक प्रकल्पाला 3 हजार 643 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे असं त्यांनी सांगितलं. गेल्या पाच वर्षात तत्कालीन सरकारने या प्रकल्पाला गती दिलेली नाही, गेल्या सरकारने सगळ्यांना अंधारात ठेऊन घाईघाईने आणि चुकीच्या पद्धतीने या स्मारकासंदर्भात निर्णय घेतले असा आरोप चव्हाण यांनी केला. महालेखा परीक्षकांनी नोंदवलेले आक्षेप लक्षात घेता, यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं . या स्मारकासंदर्भात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत, यासंदर्भात सरकार आपली बाजू ताकदीने मांडून शिवरायांचं स्मारक तातडीने पूर्ण करेल हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Bhandara News: बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget