एक्स्प्लोर

संघ आणि भाजपच्या विचारधारेत माणूस आणि माणुसकी नाही : प्रकाश आंबेडकर

अकोल्यात आयोजित ऑनलाईन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे असल्याचं आंबेडकर म्हणाले.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सोमवारी (26 ऑक्टोबर) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली आहे. ते अकोला येथे अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित ऑनलाईन 'धम्मचक्र प्रवर्तन दिना'च्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोनामुळे हा कार्यक्रम यावेळी सार्वजनिकपणे न घेता अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी प्रतिकात्मक घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांचं मुंबईवरुन लाईव्ह भाषण झालं. दरवर्षी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणाऱ्या या सभेत आंबेडकर आपली राजकीय दिशा आणि विचार स्पष्ट करत असतात.

अकोल्यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भिक्कू संघाचे अध्यक्ष बी. संघपाल, प्रा.अंजली आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप-बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पांडुरंग, राजेंद्र पातोडे यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संघ आणि भाजपच्या विचारधारेत माणूस आणि माणुसकी नाही : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर कठोर टीका या भाषणात अनेक मुद्द्यांवरुन प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. देशात कोरोनाची स्थिती गंभीर होण्यासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचं आंबेडकर म्हणाले. मोदींनी स्वत:चा 'टीआरपी' वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देशात आणत 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम केल्याचं ते म्हणाले. येथूनच देशात कोरोनाचा फैलाव व्हायला सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केंद्र सरकारवर केला आहे. मोदींनी देशवासियांना कोरोनाची भीती दाखवली. मोदींनी कोरोनाशी लढायचं केलेलं आवाहन ठीक होतं. मात्र, हे करताना सहा महिन्यांपेक्षा अधिक दीर्घकालीन लॉकडॉऊनची आवश्यकता होती का?, असा सवाल आंबेडकरांनी पंतप्रधानांना केला.

संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे लॉकडॉऊन'चा धागा पकडत आंबेडकरांनी संघ-भाजपवरही जोरदार टीका केली. कोरोनानंतर लॉकडॉऊन लावल्याने लोकांचे होत हाल होते. असे होत असताना संघप्रमुख डॉ. मोहन भागवतंनी पंतप्रधानांना परिस्थितीची जाणीव करुन दिलीच नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. देशभरात लोकांचे हाल होत असताना संघ आणि भाजपने बघ्याची भूमिका घेतल्याचं आंबेडकर म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमध्ये माणसाला किंमत नाही. सोबतच आरएसएस-भाजपच्या शासनात माणूस आणि माणुसकीला किंमत नसल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावला.

लॉकडॉऊन' काळात मोदींनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल थांबवण्यासाठी देशभरात 'कम्युनिटी किचन'ची संकल्पना का राबविली नाही?, असा प्रश्नही आंबेडकरांनी केंद्र सरकारला विचारला.

पंतप्रधान मोदी 56 इंच छातीची ताकद दाखवणार का? प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या तिन्ही कृषी विधेयकांवरही जोरदार टीका केली आहे. किमान आधारभूत मूल्याबाबत या विधेयकात काहीच ठोस तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या विधेयकाला काही राज्यांनी टोकाचा विरोध केला आहे. कृषी विधेयकात संशोधन करणार पंजाब आणि कृषी विधेयक नाकारणाऱ्या राज्य सरकारांविरोधात 56 इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 356 वापरत बरखास्त करणार का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

संघ आणि भाजपच्या विचारधारेत माणूस आणि माणुसकी नाही : प्रकाश आंबेडकर

केंद्राचे खाजगीकरण धोरण अंबानी-अदाणी धार्जिणे केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या क्षेत्राचं खाजगीकरण चालवल्याचं धोरण चुकीचं असल्याचं आंबेडकर म्हणाले. केंद्रातील कंगाल सरकार देशाची संपत्ती विकायला निघाल्याचं ते म्हणाले. हे खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकार अंबानी, अदाणींसाठी राबवत असल्याचा त्यांनी आरोप केला. यामुळे देशाची वाटचाल 'बनाना रिपब्लिक'कडे तर सुरु झाली नाही ना?, असा सवाल त्यांनी केला आहे.

पंतप्रधानांवर टीका करताना जीभ पुन्हा घसरली  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ पून्हा घसरली. सोलापूरातील आपत्तीजनक वक्तव्याचा त्यांनी आजच्या भाषणातही पुनरुच्चार केला आहे. दारुडा नवरा जसा कोणत्याही कारणासाठी बायकोला मारतो, पंतप्रधान मोदीही तसेच प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला वेठीस धरीत असल्याचं आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान मोदी या दारुड्या नवऱ्यासारखेच असल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधानांची तुलना बायकोला मारणाऱ्या दारुड्या नवऱ्याशी केली आहे. सोलापुरातील या वक्तव्यानंतर त्याचे मोठे पडसाद उमटले होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार करत त्यांनाच 'दारुडा' म्हटले होते.

एक तासाच्या भाषणात राज्य सरकारवर फक्त तीन मिनिटं बोलले आंबेडकर मुख्यमंत्र्यांना दुष्काळग्रस्तांना भेटण्यासाठी विनंती करावी लागते. सरकारने आपादग्रस्तांना मायेची सावली द्यावी, असं आंबेडकर भाषणाच्या शेवटी म्हणाले. राज्यातील सरकार तीन पायांचं असून सरकारचे तिन्ही पाय वेगवेगळे असल्याचा टोला त्यांनी लगावला. सरकारने माणसाचं जीवन सामान्य कधी करणार हे स्पष्ट करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आजच्या संपूर्ण भाषणात प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं. आपल्या 1 तास 48 सेकंदाच्या भाषणात फक्त शेवटचे तीन मिनिटं त्यांनी राज्य सरकारवर भाष्य केलं. एरव्ही शरद पवार आणि काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी संपूर्ण भाषणात मोदी विरोधाच्या अजेंड्यावरचा फोकस हटू दिला नाही. आंबेडकरांनी या भूमिकेतून राज्य सरकारसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनुल्लेखानं मारलं की, त्यांच्याप्रती ते सहानुभूतीच्या भूमिकेत आहेत का?, याची चर्चा होत आहे.

संबंधित बातम्या

पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी आणि निर्णय घ्यावा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
NCP Meeting: पटेल, तटकरे फडणवीसांना भेटले; पण सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवल्याची चर्चा; राष्ट्रवादीमधील घडामोडींची Inside Story
पटेल, तटकरे फडणवीसांना भेटले; पण सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवल्याची चर्चा; राष्ट्रवादीमधील घडामोडींची Inside Story
Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Embed widget