एक्स्प्लोर

NIA ATS Raids in Maharashtra: जालन्यातील 'तो' चामड्याचा व्यापारी एनआयएच्या कचाट्यात, पहाटे चार वाजता दरवाजा ठोठावला अन्....

देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

NIA ATS Raids In Maharashtra: दहशतवादी कृत्यात समावेश असल्याचा संशय घेत महाराष्ट्रात NIA आणि ATS ने संयुक्तपणे कारवाई करण्यास सुरुवात केली असून छत्रपती संभाजीनगर, जालन्यातून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अधिकृत सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, जालन्यात पकडण्यात आलेला संशयित तरुण चामड्याचा व्यापारी असून पहाटे चार वाजल्यापासून या तरुणाची NIA कडून चौकशी करण्यात येत आहे. देशभरात ठिकठिकाणी NIA आणि ATS ने सुरु केलेल्या छाप्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून जालना शहरातील रामनगर परिसरातून एका चामड्याच्या व्यापाऱ्यालाही NIA कडून ताब्यात घेण्यात आले आहे. 

सकाळी चार वाजल्यापासून सुरु चौकशी

जालना जिल्ह्यातील रामनगर चमडा परिसरात एका संशयितांची NIA कडून चौकशी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत असून चौकशी सुरु असलेला तरुण चमड्याचा व्यापारी असल्याचं समोर येतंय. सकाळी चार वाजता या तरुणाचा दरवाजा NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांनी दार ठोठावले आणि चामड्याचा हा व्यापारी दहशदवादी कृत्यात सामील असल्याच्या संशयातून NIA च्या तावडीत सापडला आहे. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई सुरु असून या तपासात नक्की काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काय कारणास्तव होतेय चौकशी

देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजी नगर जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून देश विघातक कृत्यांमध्ये या तरुणांचा संबंध असल्याचा संशय आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू असून प्राथमिक माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा यात समावेश आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

मालेगावात डॉक्टरच्या क्लिनीकवर छापा

नाशिकमधील मालेगावमध्येही NIA ने कारवाई केली असून अब्दुल्ला नगरच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकला आहे. मालेगाव शहरात दोन ठिकाणी एनआयएचे छापे पडले असून मध्यरात्रीपासून कसून चौकशी सुरु आहे.
अब्दुल्ला नगर मधील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला. यात संशयितांची मध्यरात्रीपासून कसून चौकशी सुरू आहे.

देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय 

देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एटीआय आणि दहशतवाद विरोधी पथक यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांची याचा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही दोन जिल्ह्यांमधून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा तपास सुरू केला असून महाराष्ट्रातही कारवाई करताना तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीकाPM Narendra Modi Speech Poharadevi Washim  : इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलंRahul Gandhi Full Speech : महागाई, बेरोजगारीवरुन भाजपवर निशाणा, राहुल गांधींचं कोल्हापुरात भाषणABP Majha Headlines : 2 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Rahul Gandhi in Kolhapur: शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी
शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी
Embed widget