एक्स्प्लोर

मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा: अजित पवार

मुंबई: 'पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि पुणे या महापालिका आम्ही कशा चालवतो आहेत ते एकदा बघा. माझं मुंबईकरांना आवाहन आहे की, गेल्या 20 वर्षापासून सेना-भाजपला सत्ता दिली. आता एकदा मुंबई पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात देऊन बघा.' असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी मुंबई पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत. 'मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा' 'शिवसेना भाजप दोन्ही पक्ष सातत्याने टीका करत आहेत. दोन्ही पक्ष गेली अनेक वर्ष सत्तेत आहेत. त्यांना आताच का एकमेकांचा भ्रष्टाचार दिसतो आहे?, आम्ही पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई ही शहरं बघा कशी घडवली आहेत. आज मी 4 वाजता दक्षिण मुंबईतून निघालो आणि मालाडला 6 वाजता पोहचलो. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. इकडे कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार चालतो, गावकडची माणसं इकडे आल्यावर मत शिवसेनेला देतात आणि गावाला आल्यावर राष्ट्रवादीला मत देतात.' असं अजित पवार म्हणाले. 'या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' 'या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.'अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर केली आहे. अजित पवारांनी मुंबई पालिकेतील कारभारासोबतच राज्यातील कारभारावरही टीका केली. 'राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे. अशावेळी सरकारनं कोर्टाकडे वेळ मागितला. बैठकीत ठराव वैगरे मांडणं वैगरे सुरु आहे. पण याप्रकरणी चालढकल सुरु आहे. त्यामुळे या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.' अशी टीका करत पवारांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा: अजित पवार 'या सरकारनं जाहिरातबाजीत खर्चाचा विक्रम मोडला असेल' राज्यात दोन वर्षे सरकारला पूर्ण होत आहेत. राज्यातील शिक्षक समाधानी नाही, शेतकरी समाधानी नाही, कायदा सुव्यस्था नाही. मेक इन महाराष्ट्र ही तर फक्त जाहीरातबाजी आहे. सरकारच्या कामगारविरोधी धोरणं यामुळे कारखाने बंद पडत आहेत. माझा तर दावा आहे की गेल्या 15 वर्षात आम्ही जेवढा खर्च जाहिरातीवर केला नाही त्यापेक्षा जास्त खर्च या सरकारनं या दोन वर्षात करुन एक विक्रम रचला असेल. अशीही त्यांनी टीका केली. 'यांचेच नेते म्हणतात, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक' 'सत्तेत आल्यानंतर हे सरकार दिलेली आश्वासनं विसरुन गेले, त्यामुळे त्यांचेच नेते म्हणतात की, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक आहे. हे काही मी बोलत नाही. त्यांचेच मंत्री म्हणतात. शिवसेनेचे अनेक खासदार म्हणतात की, पूर्वीच्या सरकारमध्ये आमची कामं तरी होत होती. दुसरीकडे अनेक आमदार आणि नेत्यांचं देखील हेच म्हणणं आहे.' असा दावा अजित पवारांनी केला आहे. 'गुंड थेट 'वर्षा'वर कसे पोहचतात?' 'निवडणुकीच्या तोंडावर भाजपत गुंडांचा समावेश होतो आहे. 'वर्षा' बंगल्यावरील तीन-तीन गेट ओलांडून गुंड आत कसे जातात, पोलिसांनी कोणाला आवरावं, निव्वळ निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांना प्रवेश दिला जातो आहे.' अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली. 'विरोधाला विरोध करणार नाही' 'समाजात तेढ निर्माण व्हावा म्हणून काहीजण जाणूनबुजून विधानं करतात. दुसरीकडे यांचेच मंत्री ट्विटरवर नाराजी व्यक्त करतात. पण आम्ही विरोधाला विरोध करणार नाही, पण या सरकारची काम करण्याची इच्छा नाही. आता किमान उरलेल्या तीन वर्षात तरी यांनी कामं करावी.' असंही पवार म्हणाले. ajit pawar 2-compressed अजित पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे:   - नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आम्ही उत्तमरित्या चालवतो आहोत, मुंबईचा विकास करण्यात शिवसेना अपयशी: अजित पवार - कामगारविरोधी धोरण असल्याने अनेक कारखाने बंद होत आहेत: अजित पवार - मेक इन महाराष्ट्र सारख्या गोष्टी म्हणजे फक्त जाहिरातबाजी: अजित पवार - आघाडी सरकारनं 15 जाहिरातींवर जेवढा खर्च केला नसेल त्यापेक्षा जास्त खर्च या सरकारनं दोन वर्षात केला आहे: अजित पवार - युती सरकारच्या दोन वर्षानंतरही जनता असमाधानी: अजित पवार - मराठा आरक्षणाबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा: अजित पवार - ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, तडीपारीचे गुन्हे आहेत अशी लोकं 'वर्षा'वर कसे पोहचतात?: अजित पवार - मराठा आरक्षणासंबंधी हायकोर्टात सरकारनेच आणखी वेळ मागितली: अजित पवार - कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी: अजित पवार - त्यांचेच नेते म्हणतात की, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक आहे: अजित पवार - सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे : अजित पवार VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Amol Khune On Manoj Jarange: कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget