एक्स्प्लोर

Nagpur Violence : नागपुरात शेकडो वाहनांची जाळपोळ, पोलिसांवर ही दगडफेक; शहरात तणावपूर्व शांतता; आतापर्यंत काय काय घडलं? 

Nagpur Violence : नागपूरमध्ये काल (सोमवार, 17 मार्च ) अचानक उसळलेले दंगल सदृश्य परिस्थितीनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? हे जाणून घेऊ .

नागपूर: नागपूरमध्ये काल (सोमवार, 17 मार्च ) अचानक उसळलेले दंगल सदृश्य परिस्थितीनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.  शहरातील महाल भागासह इतर परिसरात संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. यात कित्येक निष्पाप नागरिकांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञातांनी आग लावून पेटवून दिलीत.

तर दुसरीकडे  शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात प्रमुख्याने महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून (Nagpur Police) रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. परिणामी या संवेदनशील भागाला आता छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच आता पोलीस आणि स्थानिक प्रशानाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून शहरात सध्या तणावपूर्व शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली.  घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले.

आतापर्यंत नागपुरात नेमकं काय काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर  नागपुरात देखील विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं. त्यानंतर  संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली.

घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून पांगवण्यात आलं. मात्र कालांतराने ही बाब परिसर वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात मॉब महाल परिसरात जमा झाला. त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. 

महाल परिसरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन

त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून मुख्य रस्त्यावरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, मात्र हा जमाव परिसरातील छोट्या गल्लीबोळात पोहचला. यावेळी या जमावाने नागरिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहाने जाळून टाकण्यात आली. नंतर पोलिसांचा मोर्चा या परिसरात वळता झाला आणि येथे ही पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून जवळ जवळ 80 दंगलखोरांना अटक केली आहे. तर हे कृत्य बाहेरून येणाऱ्या लोकांनी केलं असून टिपून दगड फेक केली असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. 

सागर बंगल्यावर महत्वाची बैठक

दरम्यान, नागपूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सागर बंगल्यावर महत्वाची बैठक बोलवण्यात आली. नागपूर प्रकरण शांत करण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची कडक भूमिका असून कोणालाच सोडणार नाही. नागपूर अशांत करणारा मुख्य सूत्रधार कोण? हे शोधून काढणाचे आदेश पोलिसांना देण्यात आले. तर रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश ही यावेळी देण्यात आले.

नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत तासभर चर्चा झाली. दरम्यान बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे सकाळी तत्काळ नागपूरच्या दिशेला रवाना होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे अन्य आमदार आज घटनास्थळाची  पाहणी करणार आहे. तर वित्तीय नुकसानासह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा देखील आढावा घेणार आहे. 

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये लोकांना घराबाहेर निघू नये तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील वातावरणात तणाव कायम असल्याचे दिसत आहे.
     

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget