एक्स्प्लोर

Nagpur News : नागपूरकरांची चिंता मिटली, तोतलाडोह 50 टक्के भरलेलं, इतर धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कारण नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर सर्व धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

Nagpur Dams Water Storage : राज्यासह विदर्भातील बहुतांश भागात पाणी टंचाईचे (Water Storage) भीषण सावट असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे अनेक धारणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. राज्यात मान्सून दाखल होईपर्यंत पाण्याचे संकट (Water Shortage Issue) आणखी गडद होण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे. अशातच नागपूकरांना (Nagpur News) दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

कारण नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. एकट्या तोतलाडोह धरणात ऐन उन्हाळ्यात देखील 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

नागपूरकरांची  चिंता मिटली!

नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. मात्र, गेल्या वेळी राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अनेक मोठ्या धरणांचीही (Dam) पाणीपातळी खालावली आहे. तर गावच्या टाक्यांमध्येही पाणी दिसेना झालंय, तर नळातून पाणी येण्यासाठी 8 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागत आहे. हे चित्र विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत बघायला  मिळत आहे. असे असताना नागपूरकरांना काहीसा दिलासादायक बातमी समोर आली आहे.

तोतलाडोह 50 टक्के भरलेलं

नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोहमध्ये आजच्या स्थितीला 50 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा 10 टक्क्यांनी कमी असला तरी नागपूरची तहान भागणार असल्याने चिंता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आलीकडे विदर्भात झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. तोतलाडोह धरणाची क्षमता 1016 दशलक्ष घन मीटर आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांची स्थिती उन्हाळ्यातही चांगली असल्याची माहिती पुढे आली आहे. आज जलसाठा चांगला असल्याने एक दुष्काळ सहन करू शकेल, अशी एकंदरीत स्थिती नागपूरची आहे. तसेच आगामी पावसाळ्यात यात आणखी वाढ होईल, असे पेंच पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काय सांगते आकडेवारी ?

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयातही सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेत पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात 50 टक्के इतका जलसाठा आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 59 टक्क्यांपर्यंत होते. नवेगाव खैरीमध्येही 94 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात या जलाशयात 71 टक्के साठा होता. त्याचप्रमाणे इतर खिंडसी जलाशयात 60 टक्के, तर वडगाव जलाशयात 45 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget