एक्स्प्लोर

Ramdas Athawale: "...तर 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती," भाजप-ठाकरेंच्या सत्तेचा फॉर्म्युला फिस्कटण्यामागचं कारण आठवलेंनी सांगितलं

Ramdas Athawale: उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सत्ता आली नसती, असं वक्तव्य आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

नागपूर: मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या 105 जागा निवडून आल्या. तर शिवसेनेच्या 56 जागा निवडणून आल्या. 56 जागांच्या बळावर सेनेने भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार झाला नाही; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मदतीचा हात देत उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देत राज्यात सत्ता स्थापन केली, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत 3-2चा फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सत्ता आली नसती, असं वक्तव्य आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे. 

काय म्हणालेत रामदास आठवले?

उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीमध्ये असताना त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या. मात्र त्यावेळी 3-2चा फॉर्म्युला स्वीकारावा असं मी म्हटलं होतं. मात्र त्यावेळी दोघांनी सुद्धा तो फॉर्म्युला स्वीकारला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याला पसंती दिली, असं आठवलेंनी (Ramdas Athawale) म्हटलं आहे. 

2019 मध्ये एकत्रित निवडणूक लढलो. अमित शहा मातोश्री वर गेले होते. ते उद्धव ठाकरे यांना भेटले. तेव्हा लोकसभा व विधानसभा एकत्रित लढायच्या हे ठरल्याची माहिती होतं. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की अमित शाह यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाला मान्यता दिली होती. तर अमित शाह अनेक वेळेला बोलले आहेत, की ते असे बोललेच नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये काय झालं होतं, हे फक्त दोघांनाच माहिती आहे. निवडणूक निकाल आल्यानंतर भाजपच्या 105 जागा आल्या, 12 - 13 अपक्षांचा पाठिंबा भाजपला होता. उद्धव ठाकरे यांना 56 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्व सोबत आल्याशिवाय सरकार बनवणे शक्य नव्हतं.

तेव्हा मी संजय राऊत यांच्याशी दिल्लीत बोललो होतो. तेव्हा मी तीन वर्ष आणि दोन वर्ष मुख्यमंत्रीपदाचा पदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा संजय राऊत यांनी मला भाजपशी बोलण्यास सांगितले होते. तेव्हा भाजप श्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्ष आणि दोन वर्षाचा फॉर्मुला स्वीकारला असता, तर फडणवीस तीन वर्ष मुख्यमंत्री झाले असते आणि दोन वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता गेली नसती. मात्र, तेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही काही निर्णय घेतला नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनीही काहीच केले नाही, असंही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Prakash Amedkar: वेळ आल्यास माझं मंत्रिपदही प्रकाश आंबेडकरांना देईनAndheri Raja Visarjan Accident : अंधेरी राजा' च्या विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घटलीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PMSharad Pawar Pune : मविआमध्ये कुणाला किती जागा? 10 दिवसात निर्णय घेणार, पवारांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Crisis: भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
''सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचं कामही DPC च्या पैशातून''
''सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचं कामही DPC च्या पैशातून''
Ramdas Athawale:
"...तर 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती," भाजप-ठाकरेंच्या सत्तेचा फॉर्म्युला फिस्कटण्यामागचं कारण आठवलेंनी सांगितलं
UAN EPFO : पीएफ खात्यासाठी आवश्यक असतो UAN क्रमांक, यूएएन सक्रीय कसा करणार?
पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यापूर्वी यूएएन ॲक्टिव्ह कसा करायचा? जाणून घ्या
Embed widget