एक्स्प्लोर

Sanjay Raut : लॉन्ग मार्चमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू हा सरकारचा हलगर्जीपणा, संजय राऊत यांचा निशाणा

एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याच प्रायश्चित तुम्ही घेतलं पाहिजे. काल देखील अवकाळी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार मात्र फोडाफोडी विरोधकांच्या अवळण्यामध्ये अडकल्याचे राऊत म्हणाले. 

Sanjay Raut : शेतकऱ्यांचा लॉंग मार्चमध्ये शेतकरी चालत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा सरकारचा हलगर्जीपणा असल्याची टीका शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. सरकारने वेळेत पाऊल उचलले नाही. चर्चा करण्यासाठी नेमलेले मंत्री हे फुसके असल्याची टीकाही राऊतांनी केली. तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही म्हणता, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याच प्रायश्चित तुम्ही घेतलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. काल देखील अवकाळी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार मात्र फोडाफोडी, विरोधकांच्या नाड्या आवळण्यामध्ये अडकल्याचे राऊत म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले का?

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले आहेत का? उद्योजकांचे प्रश्न कळले आहेत का? असे सवाल करत राऊतांनी टीका केली. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागेल. हा निकाल विकत घेऊ का त्याची तयारी सुरु असल्याची टीकाही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. पण आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, मराठी माणसाला न्याय मिळेल असे राऊत म्हणाले.

राज्यात फडणवीसांनी घाणेरडं राजकारण आणलं

घाणेरडं राजकारण फडणवीस यांनी राज्यात आणि मोदी-शाह यांनी केंद्रात आणले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. कोणाच्याही कुटुंबासोबत राजकारण करु नये, अस राजकारण आम्ही कधीच केले नाही ना बाळासाहेबांनी केलं ना शरद पवारांनी केलं असेही राऊत म्हणाले. आम्ही तुरुंगात गेलो, नवाब मलिक तुरुंगात गेले, देशमुख तुरुंगात गेले. आमच्याकडे असलेले पुरावे खोटे आणि तुमचे पुरावे खरे का? असा सवाल राऊतांनी केला. आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होईल असेही राऊत म्हणाले.

अखेर लाल वादळ शमलं!

दरम्यान, अखेर पाच दिवसांच्या अथक आंदोलनानंतर शेतकरी लॉन्ग मार्च (Long March) माघारी फिरणार आहे. माजी आमदार जेपी गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला यश आले असून सरकारने मागण्या मान्य केल्याने लाल वादळ शमले आहे. आता एका ट्रेनच्या माध्यमातून हे सर्व शेतकरी घरी परतणार असल्याचे समजते.

आमच्या 70 टक्के मागण्या मान्य : जे पी गावित 

आंदोलन (Farmers Protest) स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र बैठकीच्या झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत जेपी गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget