एक्स्प्लोर

Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे परिसरासह नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Background

Maharashtra Rains Live Updates : विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं कही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातील नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विशेषत: मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.

सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ जावू शकतात. त्यामुळं नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत सतर्क राहावे. कारण पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

13:07 PM (IST)  •  06 Aug 2022

कणकवली आचरा रस्ता पाण्याखाली, वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुसळधार सुरु आहे. या पावसामुळं तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवली आचरा रस्त्यावर फणसवाडी येथे रस्त्यावर गुडघाभर अधिक पाणी आले आहे. तसेच सेंट उरसुला हायस्कुल नजीक नदी पुलाच्या दुतर्फा रस्त्यावर आचरा मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळं कणकवली ते आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कणकवली गणपती साना परिसरात रस्त्यावर पाणी आलं आहे.

10:29 AM (IST)  •  06 Aug 2022

गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडीत नदीवर पूल नाही, पावसाळ्यात दोरीच्या सहाय्याने नागरिकांचा प्रवास

राज्यातील ग्रामीण भागात अजूनही नागरिकांना साधे रस्ते, पूल मिळालेलं नाहीत. ज्यामुळे पावसाळ्यात असंख्य गावकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी या गावातील नदीवर पूल नाही तसेच रस्ताही नसल्यानं गावकऱ्यांना पावसाळ्यात दोरीच्या सहाय्याने गावात ये-जा करावी लागत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून हा जीवघेणा प्रवास असाच सुरुच आहे. गावकरी असो की शाळकरी विद्यार्थी त्यांना अशा प्रकारे ही नदी पार करावी लागत आहेत.

09:32 AM (IST)  •  06 Aug 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस, निर्मला नदीला पूर आल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला

sindhudurg rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे.  यामुळं 27 गावांचा संपर्क तुटला आहे. निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे.

08:43 AM (IST)  •  06 Aug 2022

नंदूरबार जिल्हयात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

नंदूरबार जिल्हयात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र, नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. 
08:35 AM (IST)  •  06 Aug 2022

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबईच्या सखल भागामध्ये काही वेळात पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबईचा अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget