![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत भाजपकडून आडकाठी करण्याचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
Bharat Jodo Yatra In Maharashtra: भाजपशासित राज्यात भारत जोडो यात्रेदरम्यान पोलिसांमार्फत अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला.
![Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत भाजपकडून आडकाठी करण्याचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप maharashtra Politics BJP led government trying to disturbance in rahul gandhi bharat jodo yatra said congress leader jairam ramesh Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत भाजपकडून आडकाठी करण्याचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/62b8fea95da38add92bcc1c44aeec63a1668596911320290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bharat Jodo Yatra In Maharashtra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) सुरू असून यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये भाजपशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) केला. वाशिम येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी रमेश यांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावरही टीका केली.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, भारत जोडो यात्रेमध्ये भाजपाशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर असे प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केला.
जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असून युपीए सरकारने ती लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यावरही टीका करण्यात आली होती, पैसा कोठून येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची खिल्ली उडवली होती. पण आजही तीच योजना रोजगार देण्यासाठी मोठा आधार ठरली आहे. अन्न सुरक्षा योजनेलाही नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता. आता तीच योजना जनतेला धान्य पुरवण्यास उपयोगी ठरली असल्याचे रमेश यांनी म्हटले. मनरेगा ही महाराष्ट्रातील दृष्टे नेते वी. स. पागे यांच्या संकल्पनेतून बनलेल्या रोजगार हमी योजनेवर बेतलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
विदर्भ, मराठवाड्यातील रस्त्यांची वाईट स्थिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जयराम रमेश यांनी टीका केली. त्यांनी सांगितले की, देशभरात दररोज शेकडो किलोमीटरचे रस्ते बांधतो, अशी वल्गना करणाऱ्या गडकरींना विदर्भ, मराठवाड्यातील रस्त्यांची व्यवस्थित बांधणी करता आली नाही. या भागातील रस्ते अत्यंत खराब आहेत, असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)