Maharashtra News Live Updates : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात झाली चोरी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. याबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला उत्तसरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवसर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. या संपामुळं सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.
रत्नागिरीतील खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहेत.
किसान पूत्रांचा उपवास
देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची घटना 19 मार्च 1984 रोजी घडली होती. या दिवशी चिलगव्हान ( ता. उमरखेड जि. यवतमाळ ) येथील साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेवला 39 वर्ष झाली आहेत. तरी अद्याप देखील शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. उलट यवतमाळ जिल्हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना आपण साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक दिवस अन्नत्याग आंदोलन करून थोडा धीर देऊ शकतो का? या एकत्रीकरणाच्या निमित्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही मांडणी, चर्चा होईल. शासन प्रशासनाला थोडी जाग येईल. यासाठी किसानपूत्र आंदोलनतर्फे आज राज्यभर उपवास करून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. रूईछत्तीसी येथे दुपारी 1 वाजता त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. बहुप्रतिक्षित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देऊन सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्याबद्दल हा भव्य नागरी सत्कार होणार आहे.
बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा
बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे. या मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत.
सांगलीत महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन
सांगलीत आज कृष्णनदी काठी दुपारी तीनच्या पुढे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विरुद्ध इराण मधील पैलवानांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
विशाखापट्टणम येथे भारत-ऑ
Gunaratan Sadavarte: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात झाली चोरी
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात झाली चोरी
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या कार्यालयात एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन चोरीला गेलं.
अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने वागळे इस्टेस्ट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
रत्नागिरीमधील खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात सभा
रत्नागिरीमधील खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे. माजी आमदार रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पाहणीसाठी कृषी अधिकाऱ्यांनसह स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या बांधावर
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासुन ठिक ठिकाणी वादळी वाऱ्यासह , पाऊस व गारपिट झाली आहे. यात शेतकऱ्यांच गहू, हरभरा ,कांदा , ज्वारी भाजिपाले सह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकाऱ्यांसह स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल शेत शिवारात जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणांची हुल्लडबाजी; रस्त्यावरील होर्डिंग फाडले, बसची काचही फोडली
Chhatrapati Sambhaji Nagar News: नामांतराच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले तर, महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आली आहे. नामांतराच्या समर्थनात आज शहरात शहरातील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली.
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 20 एकरवरील बटाटा झाला खराब, बांधावर कुणीच आलं नाही, शेतकऱ्यास अश्रू अनावर
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 17 मार्च रोजी एकाच दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) 2 हजार 598 हेक्टर वरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्हा कृषी विभागाच्या (Agriculture Department) प्राथमिक अहवालात आकडेवारी आली समोर आहे. एकीकडे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असतांना दुसरीकडे सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले असल्याचे चित्र आहे.