एक्स्प्लोर

Haribhau Rathod: अजून चार उपमुख्यमंत्री करा, पण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा;  हरिभाऊ राठोडांची मागणी

Haribhau Rathod: राज्यात पाऊस नसल्यामुळं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, हवे तर अजून चार उपमुख्यमंत्री करा खोचक टोला बी आर एस पक्षाचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी सरकारला लगावला आहे. 

Haribhau Rathod: पावसाळा (Rain) सुरु होऊन एक महिना झालं तरी राज्यात अद्याप चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. अशा स्थितीत बळीराजाकडे लक्ष देण्यास राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचे मत माजी खासदार आणि बी आर एस पक्षाचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी व्यक्त केले आहे. राज्यात पाऊस नसल्यामुळं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, हवे तर अजून चार उपमुख्यमंत्री करा खोचक टोला राठोड यांनी सरकारला लगावला आहे. 

राज्यकर्ते फोडा-फोडी, द्वेषाचे राजकारण करण्यात व्यस्त 

जून महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस अद्याप झाला नसल्यानं शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाकडून काहीतरी उपाययोजना करण्यात येतील या आशेवर बळीराजा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता राज्यकर्ते फोडा-फोडी, द्वेषाचे राजकारण करण्यात व्यस्त असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या समस्यांकडे लक्ष देण्यास राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचे राठोड म्हणाले.

 शेतकऱ्यांना सरकारनं योग्य ती मदत जाहीर करावी

राज्यामध्ये लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरकारनं योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील राठोड यांनी केली. तसेच हवे तर आपल्या राज्याला अजून चार उपमुख्यमंत्री नेमावे असा टोलाही हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारला लगावला.

बळीराजा अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत 

राज्यातील काही भागात चांगला पाऊस होत आहे, तर काही भागात अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. पावसाळा सुरु होऊन महिना उलटला तरी अद्याप राज्यात चांगला पाऊस झाला नाही. मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण या भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पाऊस (Rain) बरसत असताना दिसत असला तरी उर्वरीत महाराष्ट्रात (Maharashtra) अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. संपूर्ण देशात सर्वात कमी पावसाची नोंद ही मराठवाड्यात झाली आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आव्हानं वाढली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : पाण्याअभावी वाळत चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, राजू शेट्टींची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवारTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Embed widget