एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: जलवाहिन्यांवरील गळती रोखण्यासाठी मुंबईहून खास पाणबुडे, जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

Water Issue : रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते, ज्यात 20 पेक्षा अधिक गळती थांबविण्यात मनपाला यश आले आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar Water Issue : छत्रपती संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhaji Nagar City) पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या सतत फुटत असतात. तर अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. दरम्यान उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा (Water Issue) सामना करावा लागतो. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आता या दोन्ही जलवाहिनीवरील पाणी गळती थांबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी खास पाणबुडे बोलावण्यात आले. तर शनिवारी दुपारी साडेबारा वाजता या पाणबुडीच्या मदतीने 700 मिमीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. तर रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते, ज्यात 20 पेक्षा अधिक गळती थांबविण्यात मनपाला यश आले आहे. 

जुन्या शहराला 700 मिमी आणि 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्या असून, सतत फुटत असतात. जलवाहिन्या फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा देखील सतत विस्कळीत होत असतो. तर अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांना तडे गेले असून, त्यातून पाणी गळती होत असते. त्यामुळे ही पाणी गळती थांबवण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.  परंतु जलवाहिनीला गळती लागलेल्या ठिकाणी जलवाहिनीवर सिंमेटचे रस्ते बनवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता न खोदता पाणबुड्यांच्या मदतीने गळती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुंबई येथून पाणबुडे विष्णू शिवतारे व त्याचे सहकारी यांना बोलवण्यात आले आहे. तर शनिवारी दुपारी या पाणबुड्यांच्या साह्याने जलवाहिनीतील गळतींचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले. तीन पाणबुड्यांनी गळतीचा शोध घेत दुरुस्ती सुरू केली आहे. 

उन्हाळा लागताच शहरात पाणी टंचाई? 

छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जुन्या झाल्या आहेत. त्यातच वाढती लोकसंख्यामुळे पाण्याची मागणी देखील कितीतरी पटाने वाढली आहे. त्यामुळे उन्हाळा लागताच शहरातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवत असते. अनेक भागात दहा-दहा दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पाणी प्रश्न कायम आहे. अनेकदा नवनवीन योजना जाहीर करण्यात आल्या, मात्र त्या पूर्ण होऊ शकल्या नाही. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न कायम आहे. 

राजकीय नेत्यांचं अपयश...

राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे सुरुवातीपासूनच एक वेगळे महत्व राहिले आहेत. या शहरातील अनेक लोकप्रतिनिधी राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत मंत्री राहिले आहे. एवढच नाही तर सध्या केंद्रात दोन आणि राज्यातील सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन असे एकूण पाच मंत्री आहेत. मात्र असे असताना देखील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे शहरात निर्माण झालेला पाणी प्रश्न राजकीय नेत्यांचं अपयश म्हणाले लागेल. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; सरकारने काढला आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
Dharashiv Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, गाडीचे टायर्स फुटले, धाराशिवमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू
Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर
D Mart sale: आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक
Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Embed widget