![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aurangabad: 'मुल होत नाही, नवरा म्हणाला जीव दे'; महिला थेट तलावावर पोहचली अन्....
Aurangabad Crime: रोजच्याच छळाला कंटाळून 27 वर्षीय महिलेने रागाच्या भारात हर्सूल तलाव गाठत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला.
![Aurangabad: 'मुल होत नाही, नवरा म्हणाला जीव दे'; महिला थेट तलावावर पोहचली अन्.... maharashtra News Aurangabad Crime News Woman attempts to commit suicide in lake Aurangabad: 'मुल होत नाही, नवरा म्हणाला जीव दे'; महिला थेट तलावावर पोहचली अन्....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/33894f53c3c11fb0eb6931efaabe9d671676975073081443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) हर्सूल तलाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'लग्न होऊन 12 वर्षे झाल्यानंतरही मुल होत नाही, त्यामुळे तू कुठेतरी जाऊन जीव दे, म्हणजे मी दुसरे लग्न करतो' असे पतीने पत्नीला म्हणत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या रोजच्याच छळाला कंटाळून 27 वर्षीय महिलेने रागाच्या भारात हर्सूल तलाव गाठत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थ टळला आहे. ही घटना 19 फेब्रुवारीच्या दुपारी तीन वाजेदरम्यान घडली.
19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, विविध कार्यक्रमांची तयारी सुरु असल्याने शहरातील चौकाचौकात गर्दी असतानाच हर्सूल तलाव येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा दामिनी पथकाला फोन आला. एक महिला जीव देण्यासाठी आली असून, पटकन येण्याचे कळविले. दरम्यान दामिनी पथकाच्या पोलिस नाईक सुजाता खरात-जाधव आणि चालक प्रियंका भिवसने तत्काळ हर्सूल तलाव परिसरात पोहचल्या. तसेच त्यांनी सुरुवातीला आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला ताब्यात घेतले.
आत्महत्या करण्यासाठी थेट तलावावर पोहचली...
पीडित 27 वर्षीय महिलेचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तिला मुलं होत नसल्याने, तिला पतीकडून त्रास दिला जात होता. एवढंच नाही तर, मारहाण देखील केली जात होती. तसेच तू कुठेतरी जाऊन जीव दे, म्हणजे मी दुसरे लग्न करतो, असे टोमणे पतीकडून सतत मिळत असल्याने महिला त्रासाला कंटाळली होती. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचं ठरवलं. तर 19 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेदरम्यान ती हर्सूल तलावावर जीव देण्यासाठी पोहचली. मात्र तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांना संशय आल्याने त्यांनी महिलेला थांबवून विचारपूस केली. तेव्हा ती आत्महत्या करण्यासाठी आल्याचे समोर आले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी याची तत्काळ दामनी पथकाला माहिती दिली आणि मोठा अनर्थ टळला.
पतीने मागितली पोलिसांसमोर पत्नीची माफी...
दामिनी पथकाने आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेची समजूत काढत तिला हर्सूल पोलिस ठाण्यात नेले. तसेच तिच्या पतीलाही बोलावून घेतले. समूपदेशनानंतर पतीने पोलिसांसमोर पत्नीची माफी मागत पत्नीस त्रास देणार नसल्याचे कबुल केले. मात्र आजवर पत्नीला त्रास देत असल्याने तिने पतीविरोधात तक्रार अर्ज दिल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. ही कार्यवाही दामिनीच्या प्रमुख तथा पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनीच्या सुजाता खरात-जाधव आणि प्रियंका भिवसने यांनी पार पाडली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Student Suicide: धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस आधी बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)