एक्स्प्लोर

Hingoli News: मराठवाड्यात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली, हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे स्थालंतर

Hingoli Water Issues :  गावकऱ्यांना दोन-तीन किलोमिटर लांबून डोक्यावर पाणी आणतायत. 

Hingoli Water Issues:  उन्हाळा लागला आणि तापमान वाढायला लागलं की, पाणीटंचाई (Water Issues) सुरू होते. याच पाणीटंचाईच्या झळा आता हिंगोली जिल्ह्याला (Hingoli District) बसताना पाहायला मिळत आहे. हिंगोलीच्या लक्ष्मण नाईक तांडा गावाला अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यातच या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर गावतील नागरिक भर उन्हात पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणताना पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे गावाला पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिक अक्षरशः गाव सोडून गेलेत. या गावातील 50 टक्के लोकांचे पाण्यामुळे स्थलांतर झाले आहे. तर उर्वरित गावकऱ्यांना दोन-तीन किलोमीटर लांबून डोक्यावर पाणी आणतायत. 

हिंगोली जिल्ह्यातील 1500 लोकसंख्या आसलेल्या लक्ष्मण नाईक तांडा गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हे गाव डोंगराळ भागात असल्याने, भारताच्या नकाशावर आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून उन्हाळा लागला की, पाणीटंचाईची समस्या या गावकऱ्यांच्या नशिबी कायम पाहायला मिळते. गावात पाणी नसल्याने नागरिक दोन किलोमीटर डोंगरात पायपीट करून डोंगरातील विहिरीतून पाणी आणतात. विशेष म्हणजे यासाठी देखील जीवघेणी कसरत करावी लागते. 

गावकऱ्यांची दिवसभर पाण्यासाठी पायपीट 

गावात पाणीच नसल्यानें गावातील 50 टक्के गावकऱ्यांनी स्थलांतर केले आहे. तर अनेकांनी गाव सोडून जाण्याची पसंती दिली आहे.  गावात राहत असलेल्या नागरिकांची पाण्याशिवाय मोठी वाटाघात होत आहे. त्यातच मुलं सोडून गेलेल्या वृद्ध व्यक्तींना डोंगरात पाणी आणण्यासाठी मोठ कसरत करावी लागत आहे. तर काहींना डोंगरात जाणे शक्यच होत नाही. विशेष म्हणजे गावात पाणी नसल्याने गावापासून दोन किलोमिटर आसलेल्या डोंगरात पायपीट करत नागरिक डोक्यावर पाणी आणत आहेत. त्यामुळे  लक्ष्मण नाईक तांडा गावातील नागरिक दिवसभर पाण्यासाठी पायपीट करत असतात. धक्कादायक म्हणजेच नेहमीच पायपीट करून पाणी आणल्याने काही नागरिकांना आजार जडल्याचे सुद्धा गावकरी सांगतात. त्यामुळे लक्ष्मण नाईक तांडा गावातील पाण्याची समस्या सोडवावी आशि मागणी गावकरी  करत आहेत.

गावात शासकीय योजना पोहचल्याच नाही...

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून सतत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात देखील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांची नळ योजना राबवली जात आहे. मात्र असे असताना  लक्ष्मण नाईक तांडा गावात अजूनही शासनाची कोणतेही योजना अजून पोहचू शकली नाही. त्यामुळे एकीकडे मराठवाडा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील लक्ष्मण नाईक तांडा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः स्थालंतर करत असल्याचे चित्र आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या :

उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाची चतुःसूत्री, 'अशा' प्रकारे करा उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन मगच मिळेल अधिकचे उत्पन्न

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget