Maharashtra Gram Panchayat Elections LIVE : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76 टक्के मतदान
Gram Panchayat Election 2022: आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स

Background
Gram Panchayat Election 2022: आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. त्याचसोबत थेट सरपंचपदासाठीही आज मतदान (Voting) होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील (Nandurbar Gram Panchayat Elections) 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींमध्ये गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवली आहे.
धुळे जिल्ह्यातील (Dhule Gram Panchayat Elections)33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 05 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 45 मतदान होणार आहे.
अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या,
नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33.
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02.
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01.
वाशीम: कारंजा- 04.
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08.
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04.
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17.
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 01.
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08.
कोल्हापूर: कागल- 01.
एकूण: 608
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76 टक्के मतदान
Grampanchayat Election : राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.
Grampanchayat Election : नंदुरबारमध्ये पाच वाजेपर्यंत 72 टक्के मतदान
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील 149 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदान केंद्रावर साडेपाचनंतर देखील मतदानासाठी रांगा असल्याचे दिसून आल्या. त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आत असणाऱ्या मतदारांना घेवून मतदान सुरु होते. जिल्ह्यात पाचवाजे पर्यत अंदाज 72 टक्के मतदान झाले असून अंतिम आकडेवारी येण्यासाठी आणखीन काही वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आज झालेल्या मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडून आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या





















