![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,988 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
![Maharashtra Corona Update : राज्यात आज 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,988 रुग्ण कोरोनामुक्त maharashtra corona cases 5988 patients discharged today 3626 new cases in the state today Maharashtra Corona Update : राज्यात आज 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,988 रुग्ण कोरोनामुक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/04/f24a188db9d1a005021f84f9b2504c4d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात आज 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 09 टक्के आहे.
राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,413 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (71), नंदूरबार (2), धुळे (3), जालना (45), परभणी (59), हिंगोली (18), नांदेड (23), अमरावती (90), अकोला (16), वाशिम (11), बुलढाणा (90), यवतमाळ (12), नागपूर (53), वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5), गडचिरोली (34) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 49,99,475 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,89,800 (11.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,03,199 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 379 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 379 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 417 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3771 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1290 दिवसांवर गेला आहे.
गेल्या 24 तासात 42 हजार रुग्णांची भर तर 308 जणांचा मृत्यू
देशात कोरोनाची तिसरी लाट कधीही येण्याची शक्यता असताना अद्याप दुसरी लाट ओसरल्याचं दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 42,766 नव्या रुग्णांची भर पडली असून 308 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 38,901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी देशात 42, 618 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 29,682 रुग्णांची भर पडली आहे. तसेच 142 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत केरळमध्ये 41 लाख 81 हजार 137 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)