एक्स्प्लोर

जळगाव जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी वाढली; गिरणा नदी पात्रात राजरोसपणे उत्खनन

जळगाव जिल्ह्यात रेती माफियांचा मुजोरी चांगलीच वाढली असून अवैध रेती उपसा होत आहे. यामुळे मुंबई नागपूर हायवेवर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

जळगाव : शहरालगत असलेल्या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रेती माफियांनी गिरणा नदी पात्राचे अक्षरशः लचके तोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने या विरोधात कारवाया केल्या जात असल्या तरी त्या अतिशय नाममात्र असल्याने रेती मफियांनी आपले पाय घट्ट रोवले असल्याचं दिसून येतं आहे. शिवाय मुबई नागपूर हायवेवर गिरणा नदीवर बांभोरी गावाजवळ असलेल्या पुला लगतच मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याने या पुलाचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे रेती उत्खनन त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

या वाळू उत्खननातून अवैध रेतीचा दिवस रात्र मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने नदी पात्रातील रेतीचं प्रमाण कमी झाल्याने परिसरातील भूजल पातळीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. यासह विविध प्रकारचे जल किडे, मासे, शंख, शिंपले या उपशामुळे नष्ट झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एकूण 43 वाळू घाटांपैकी 25 वाळू गटांना पर्यावरण संदर्भात परवानगी प्राप्त असल्याने 25 वाळू गट हे लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 9 गटांचे औक्षण झाले आहे. त्यापैकी फक्त 7 गटांना ताबा देण्यात आला आहे. आतापर्यंत महसूल विभागाला या माध्यमातून तब्बल 11 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध यावेत म्हणून प्रशासनाने मागील वर्षात 750 पेक्षा अधिक प्रकरणे शोधून काढली आहेत. या माध्यमातून 9 कोटी 3 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, या कारवाईला न जुमानता ही रेती माफिया राजरोसपणे उपसा करीत असल्याने रेती माफियांवर कडक कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहारालगत असणाऱ्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. यामुळे गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले आहेत. अनेकवेळा या खड्डयांमधील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच यामुळे पर्यावरणाचा देखील मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे. नागपूर मुंबई महामार्गवरील पुलालगत वाळू उत्खनन सुरू असल्याने देखील पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला असून पुलाच्या 500 मीटर आवारात कलम 144 लागू करण्यात आले असताना देखील या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरु असून प्रशासन मात्र रेती माफियांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हतबल झाल्याचे चित्र आहे. रेती माफियांकडून अवैध उपसा करताना सर्वच यंत्रणांची काही प्रमाणात मिली भगत असल्याने या माफियांवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे अडचणीचे होऊन बसले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम
मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम
आईसह चार मुलांना विषबाधा, तीन चिमुकल्यांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादारलं
आईसह चार मुलांना विषबाधा, तीन चिमुकल्यांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादारलं
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget