एक्स्प्लोर

जळगाव जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी वाढली; गिरणा नदी पात्रात राजरोसपणे उत्खनन

जळगाव जिल्ह्यात रेती माफियांचा मुजोरी चांगलीच वाढली असून अवैध रेती उपसा होत आहे. यामुळे मुंबई नागपूर हायवेवर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

जळगाव : शहरालगत असलेल्या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रेती माफियांनी गिरणा नदी पात्राचे अक्षरशः लचके तोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने या विरोधात कारवाया केल्या जात असल्या तरी त्या अतिशय नाममात्र असल्याने रेती मफियांनी आपले पाय घट्ट रोवले असल्याचं दिसून येतं आहे. शिवाय मुबई नागपूर हायवेवर गिरणा नदीवर बांभोरी गावाजवळ असलेल्या पुला लगतच मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याने या पुलाचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे रेती उत्खनन त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

या वाळू उत्खननातून अवैध रेतीचा दिवस रात्र मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने नदी पात्रातील रेतीचं प्रमाण कमी झाल्याने परिसरातील भूजल पातळीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. यासह विविध प्रकारचे जल किडे, मासे, शंख, शिंपले या उपशामुळे नष्ट झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एकूण 43 वाळू घाटांपैकी 25 वाळू गटांना पर्यावरण संदर्भात परवानगी प्राप्त असल्याने 25 वाळू गट हे लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 9 गटांचे औक्षण झाले आहे. त्यापैकी फक्त 7 गटांना ताबा देण्यात आला आहे. आतापर्यंत महसूल विभागाला या माध्यमातून तब्बल 11 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध यावेत म्हणून प्रशासनाने मागील वर्षात 750 पेक्षा अधिक प्रकरणे शोधून काढली आहेत. या माध्यमातून 9 कोटी 3 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, या कारवाईला न जुमानता ही रेती माफिया राजरोसपणे उपसा करीत असल्याने रेती माफियांवर कडक कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहारालगत असणाऱ्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. यामुळे गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले आहेत. अनेकवेळा या खड्डयांमधील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच यामुळे पर्यावरणाचा देखील मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे. नागपूर मुंबई महामार्गवरील पुलालगत वाळू उत्खनन सुरू असल्याने देखील पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला असून पुलाच्या 500 मीटर आवारात कलम 144 लागू करण्यात आले असताना देखील या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरु असून प्रशासन मात्र रेती माफियांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हतबल झाल्याचे चित्र आहे. रेती माफियांकडून अवैध उपसा करताना सर्वच यंत्रणांची काही प्रमाणात मिली भगत असल्याने या माफियांवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे अडचणीचे होऊन बसले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

व्हिडीओ

Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget