एक्स्प्लोर

नवी मुंबईतील मोरबे धरणाची उंची वाढवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

मुंबई मनपाच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरणाची उंची वाढवून जादा पाणी साठा कसा होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील  लोकसंख्या सध्या  15 लाख आहे. या ठिकाणची लोकसंख्या वाढीचा वेग तब्बल 60 टक्के आहे. इतर शहरात तो 10 टक्यापर्यंत असतो. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होवू शकतो. यावर आताच विचार करून महानगर पालिकेने पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी मनपाच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरणाची उंची वाढवून जादा पाणी साठा कसा होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहेत. नवी मुंबई शहराचा आढावा घेण्यासाठी आज अजित पवार महानगर पालिकेत आले होते. 

गेल्या दीड महिन्यात अजित पवार यांचा नवी मुंबईत तिसरा दौरा आहे. यामध्ये पवार यांनी महानगरपालिका, सिडको , पोलीस, एमआयडीसी विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी रायगडचे खासदार सुनिल तटकरे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग उपस्थित होते. महानगर पालिका प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती पवार यांनी घेतली असता भविष्यात शहरासाठी अनेक समस्या भेडसावणार असल्याचे लक्षात आले. यामध्ये मुख्य समस्या पाण्याची असून यावर मनपा प्रशासनाने त्वरीत काम सुरू करावे असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता मोरबे धरणाची उंची वाढविण्याबरोबर खोपोली येथील  टाटा विज प्रकल्पातून निघणार्या पाण्यावर बंधारा बांधणे, हेटवणे धरणातील 50 एमएलडी पाणी मिळवण्याबाबत पावले उचलावीत अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत. 

लोकांकडून मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जाते.  किंवा आर्थिक स्थिती योग्य नसल्याने मालमत्ता कर भरण्यास उशीर केला जातो. त्यामुळे यावर 24 टक्यांपर्यंत व्याज वसूल केले जाते. यावर सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून मालमत्ता करावर लागणारा दंड १२ टक्क्यांच्या खाली असावा अशा सुचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना दिल्या असल्याचे अजितदादांनी सांगितले. नवी मुंबई शहरात महानगर पालिका कडून प्रत्येक नोड मध्ये हाॅस्पीटलच्या सुसज्ज इमारती उभ्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार कडून या ठिकाणी पीजी मेडिकल काॅलेज आणि नर्सिंग कोर्स सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वस्तातले शिक्षण मिळून मनपा रूग्णालयासाठी डाॅक्टर उपलब्ध होतील. 

नवी मुंबई शहरातील प्रदूषणावर विशेष लक्ष देत पर्यावरण पूरक निर्णय घेण्यावर मनपाने लक्ष केंद्रीत करावे. यासाठी 
नवी मुंबई मनपा परिवहन सेवेत सध्या इलेक्ट्रीक बस असून भविष्यात सर्व बस इलेक्ट्रीकवर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. हाॅटेल मधून निघणार्या ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून गॅसची निर्मिती करीत तो गॅस सीएनजी बससाठी वापरावा. 
शहरात पर्यावरणावर काम करताना विदेशी झाडे लावण्यापेक्षा स्थानिक झाडांना प्राधान्य देण्यात यावेत. जेणे करून वादळवार्यात झाडे उन्मळून पडणार नाहीत. 

शहरातील पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात असून यापुढे तयार होणार्या घरांना पार्किंग बंधनकारक करावे. यामध्ये वन बीएचकेला 1 , टू बीएचकेला 2 , तर थ्री बिएचकेला 3 पार्किंग राखून ठेवण्याचा निर्णय घ्यावा. त्याच बरोबर लोकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी फिरत्या मोबाईल भाजीपाला गाडीला परवानगी देण्यात यावी. अशा महत्वपुर्ण सुचना अजित पवार यांनी नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनास दिल्या आहेत. 

निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत  अद्याप निर्णय नाही

येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकाबरोबर नवी मुंबई , औरंगाबाद, कल्याण डोंबिवली , वसईविरार, कोल्हापूर आदी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र या निवडणूका शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस महाविकास आघाडी करून लढविण्याबाबत कोणताही निर्णय अजून तरी झालेला नाही.  त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्या नंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
Embed widget