एक्स्प्लोर

आंब्याच्या पेटीतून 12 लाखांची लाच, ठाण्यातील IAS अधिकारी अटकेत

ठाणे : ठाण्यात आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाखांची लाच मागितली होती. आंब्याच्या पेटीमधून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माळींना अटक करण्यात आली आहे. तसंच आयएएस अधिकारी मिलिंद गवादेंनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने शनिवारी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या आयएएस अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांच्यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र ही 12 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या किरण माळींना रंगेहाथ पकडण्यात आलं. रात्री उशिरा मिलिंद गवादे यांनाही पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. आदिवासी विकास खात्यातील एका कर्मचाऱ्याकडे पदोन्नतीसाठी 12 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी गवादेंनी केली होती. काय आहे प्रकरण? ठाण्यातील आदिवासी विकास विभागातील 12 कर्मचाऱ्यांची आश्रमशाळांच्या रेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. अधीक्षक पदावरुन आश्रमशाळांच्या रेक्टरपदी त्यांना काही वर्षांपूर्वी पदोन्नती देण्यात आली होती. ही पदोन्नती रद्द करण्याची धमकी देत 12 कर्मचाऱ्यांकडून 12 लाखांची लाच आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी मागितली होती. शैक्षणिक पात्रतेअभावी पदोन्नती रद्द करण्याची धमकी देत प्रत्येकी एक लाखांची लाच कर्मचाऱ्यांकडून मागण्यात आली होती. एका कर्मचाऱ्यानं लाच लुचपत प्रतिबंधक खात्याला याची तक्रार दिल्यावर सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या किरण माळी आणि लाच मागणाऱ्या मिलिंद गवादे या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget