एक्स्प्लोर

नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट

नवी मुंबई एपीएमसीमध्ये मराठवाड्यातून आलेल्या 60 ते 70 शेतकऱ्यांचा मोसंबीचा माल पड्या दरात घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा डाव शेतकऱ्यांनी हाणूण पाडला आहे.

नवी मुंबई : पावसाने पाठ फिरवली असतानाही शेतकरी कसाबसा पीक जगवत आहे. पण व्यापाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांची पिळवणूक सुरुच आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये मराठवाड्यातून आलेल्या 60 ते 70 शेतकऱ्यांचा मोसंबीचा माल पड्या दरात घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा डाव शेतकऱ्यांनी हाणूण पाडला आहे. बाजार समितीच्या नियमानुसार किलोप्रमाणे भाव देण्याची पद्धत आहे. पण व्यापाऱ्यांनी पेटीतून सुट्टा माल घेत पैसे दिले आणि त्यातूनही 10 टक्के कपात केली. या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मोसंबी, संत्र्यांचे व्यवहार बंद पाडले. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीडमधून आपला शेतीमाल घेऊन शेतकरी नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आले. औरंगाबादमध्ये मोसंबी, संत्री यांना चांगली किंमत मिळत नसल्याचे वाशीतील एपीएमसीमध्ये दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी थेट मुंबईचं प्रवेशद्वार गाठलं. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट 60 ते 70 गाड्या भरुन आलेला माल विकण्याचा प्रयत्न केला असता एपीएमसीमधील होलसेल व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार शेतकऱ्यांचा माल घेताना किलो प्रमाणे घेणं बंधनकारक आहे. पण व्यापारी येथील होलसेल पाटीचं प्रमाण लावून डझनावारी माल घेत होते. पाटीवर किंमत ठरवली जात असल्याने याचं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे. योग्य किंमत हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. किलोला भाव मिळाल्यास तीप्पट ते चौपट फायदा शेतकऱ्यांच्या झोळीत पडणार होता. पण व्यापाऱ्यांनी हा सर्व नफा आपल्या खिशात टाकला. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या शेती मालाचे पैसे देताना परत एकदा 10 टक्के कमिशन कापलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट पणन विभागाच्या कायद्यानुसार, एपीएमसीमध्ये मालाची समोरासमोर खरेदी करण्याचा नियम आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल कोणत्या किंमतीत विकला जात आहे याची माहिती समोरासमोर होण्यासाठी हा कायदा करण्यात आला. मात्र याही कायद्याला फाटा देत व्यापारी वर्गाकडून रूमालाखाली हात धरून किंमत ठरवली जाते. यामुळे शेतमालाला किती किंमत मिळाली याची माहिती मिळत नसून थेट बिल हाती थोपवलं जातं. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट आपला माल विकताना फसवणूक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांचा माल न विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत. नियमाला बगल देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस दिली जाणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget