एक्स्प्लोर
पाच दिवसांचे बाप्पा निघाले गावाला
मुंबई: मोठ्या आनंदाने आणि उत्साहात घरोघरी आगमन झालेल्या पाच दिवसांच्या बाप्पांना आज विधिवत निरोप दिला जाणार आहे. मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होतं. त्यामुळे पालिकेतर्फे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून गणपती विसर्जनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागातही पाच दिवसांच्या बाप्पांना विधिवत निरोप देण्यात येईल. गेल्या सोमवारपासून बाप्पांचे घरोघरी आगमन झाले. बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. काही भाविकांनी दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. आत आज पाच दिवसांचे बाप्पाचेही विसर्जन होणार आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















