एक्स्प्लोर

वाढत्या उन्हामुळे हापूसला 'ताप'; शेतकरी, आंबा बागायतदार चिंतेत!

कोकणात सध्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पारा अगदी 42 डिग्री अंश सेल्सिअसवर देखील पोहोचलेला पाहायाला मिळाला. त्याचा परिणाम हा हापूस आंब्यावर होताना दिसत आहे.

रत्नागिरी : हापूस! कोकणचा राजा. जगाच्या बाजारपेठेत देखील हापूसला मोठी मागणी आहे. शिवाय, खवय्यांना देखील उन्हाळ्याची चाहुल लागताच हापूसची चव चाखण्याची आतुरता असते. पण, यंदा नैसर्गिक संकटांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्यानं अद्याप देखील अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारपेठेत दाखल झालेला नाही. लांबलेला पाऊस, थंडीचं कमी प्रमाण, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला. हे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय वाढत्या उष्णतेचा परिणाम आता हापूसवर झाला आहे. 

कोकणात सध्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पारा अगदी 42 डिग्री अंश सेल्सिअसवर देखील पोहोचलेला पाहायाला मिळाला. त्याचा परिणाम हा हापूस आंब्यावर होताना दिसत आहे. वाढत्या तापमानाचा दाह हापूसला सहन होत नाही. त्यामुळे आंबा आतून सुका होत आहे. काही ठिकाणी त्याला आंबा लासा होणे असं देखील म्हणतात. सध्याची सारी परिस्थिती पाहता आंबा बागायतदार आणि शेतकरी देखील पुरते हवालदिल झाले आहेत. यावर उपाय देखील काही नसल्यानं कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. 

कैरी, छोट्या फळांना देखील फटका

इतकंच नाही तर कैरी किंवा हापूसच्या छोट्या फळांवर देखील वाढत्या तापमानाचा परिणाम होताना दिसत आहे. वाढलेल्या तापमानामुळे फळं गळून पडत आहेत. परिणामी यातून सावरायचं तरी कसं? असा प्रश्न कोकणातील शेतकऱ्यांना पडला आहे.

उरली-सुरली आशा देखील संपण्याची भीती

वातावरणातील वारंवार झालेल्या बदलांमुळे यापूर्वी आंब्यावर होणारा फवारणीचा खर्च हा चार पटीनं वाढला. त्यात आता वाढत्या उष्णतेचा फटका तोडणी योग्य फळांना बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक गणितं देखील कोसळत असल्याचं दिसून येत आहे. यंदा सारखं वातावरण किमान आम्ही मागील 60 ते 70 वर्षात तरी आम्ही पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया जूने-जाणते हापूस आंबा उत्पादक शेतकरी देतात. त्यावरून यंदा हापूससमोर आलेल्या नैसर्गिक संकटांचा किमान अंदाज आपल्याला नक्कीच बांधता येईल. 

हापूसच्या नावानं कर्नाटक आंब्याची विक्री

सध्या राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये हापूसच्या नावानं कर्नाटकी आंब्याची विक्री होताना दिसत आहे. कर्नाटकी आंबा दिसायला हापूसप्रमाणेच असल्यानं ग्राहकांची देखील फसवणूक होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी हापूस खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन कोकणातील शेतकरी करत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget