एक्स्प्लोर

घरपोच दारु म्हणजे घरपोच कोरोना : डॉ. अभय बंग

जगात आज होणार्‍या एकूण रोग, मृत्यू व अपंगत्वाच्या सर्वोच्च सात कारणांमधे दारु एक आहे. भारतात दरवर्षी दारुमुळे पाच लक्ष मृत्यू होतात. विजय वडेट्टीवारांनी असा संशय व्यक्त केला आहे की, “शासनाकडे नसलेली आकडेवारी डॉ. अभय बंगांकडे असते".

गडचिरोली : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये दारुची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे दारु दुकानांसमोर झालेली गर्दी, लांब रांगा व सोशल डिस्टन्गसिंची तोडमोड झालेली सर्वांनी पाहिली. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ‘राज्यशासनांनी घरपोच दारु पुरवण्याचा विचार करावा’ ही सूचना केली आहे. पण घरपोच दारुचा परिणाम घरपोच कोरोना, घरपोच हिंसा आणि पाच लक्ष मृत्यूच्या स्वरुपात देशाला भोगावा लागणार आहे. शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरज आहे, असे डॉ. अभय बंग म्हणाले.

डॉ. बंग म्हणाले, कोरोना पसरू शकतो या भीतीने अनेक घरपोच सेवा बंद करण्यात आल्या. त्या न्यायाने घरपोच दारू म्हणजे ‘घरपोच कोरोना सेवा’ठरू शकते. दारु न पिताच सामाजिक अंतराची शिस्त तोडणारी माणसे दारु पोटात व डोक्यात गेल्यावर घरी व अन्यत्र सामाजिक अंतराचे पालन करतील का? आणि भारतात अशी पाच कोटी दारुग्रस्त माणसे आहेत. दोन पाच हजार तबलिगींना दोष देणारे शासन पाच कोटी कोरोना प्रसारक समाजात घरपोच मोकळे सोडणार आहे.

न्यायालयाला दारु ही नागरिकांची मूलभूत गरज व हक्क वाटतो का असा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, पुरुष गर्दी करतात ती प्रत्येक सेवा घरपोच सुरू करावी का? दारुच्या नशेत पुरुष घरात बेताल वागू शकतात. ते बघणार्‍या घरातील लहान मुलांवर काय परिणाम होतील ? घरपोच दारुमुळे स्त्रियांवर घरपोच हिंसा होईल. सर्वोच्च न्यायालयने या परिणामांचा विचार केला का? न्यायालयाने किमान एवढे तर लक्षात ठेवायला हवे होते की भारताच्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दारुबंदी व दारुच्या दुष्परिणामांचे नियंत्रण हे शासनाचे कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालय त्या नियंत्रणाऐवजी घरपोच दारु पोहचवा असे म्हणते आहे. न्यायालयाच्या या सूचनेची तपासणी करायला हवी. विरोध करायला हवा; अंमलबजावणी नाही.

राज्यशासनाला उत्पन्नाची तातडीने गरज आहे म्हणून दारू दुकाने उघडली असे शासन म्हणते. पण त्यामुळे जर सोशल डिस्टसिंगचा भंग व कोरोनाचा प्रसार होणार असेल तर मग जीव महत्वाचे की उत्पन्न? आणि जीवांपेक्षा उत्पन्न महत्वाचे असल्यास मग कोरोनाचा फैलाव थांबवायला गेले पंचेचाळीस दिवस पूर्ण देशाच्या व जनतेच्या उत्पन्नाला उगाच का थांबवून ठेवले आहे? शासनाची गल्लत होते आहे. उत्पन्नही महत्वाचे आहे. पण दारू मधून शासनाला मिळणारा महसूल म्हणजे ‘उत्पन्न शासनाला, भूर्दंड समाजाला’ हे कितपत योग्य आहे? निव्वळ आर्थिक परिभाषेत बोलायचे तर अनेक तज्ज्ञांनी दारूमुळे उत्पन्नापेक्षा समाजाला जास्त मोठी किंमत चुकवावी लागते असे दाखवून दिले आहे. पीजीआय, चंदीगढ या भारत सरकारच्या शिखर संस्थेचे तज्ज्ञ डॉ. शंकर प्रिंजा, राजेशकुमार आंतरराष्ट्रीय नियतकालिकात याचा हिशोब प्रकाशित केला आहे. त्यानुसार 2011 ते 2050 या चाळीस वर्षात भारतातील सरकारांना दारू पासून जितका कर मिळेल त्यापेक्षा दरवर्षी अडीच लक्ष कोटी रुपये किंवा देशाच्या जीडीपीच्या पाऊणे दोन टक्का एवढे जास्त नुकसान होईल. देशाच्या आरोग्यावर भारतातली सर्व शासने मिळून खर्च करतात 1.2 टक्का जीडीपी आणि दारुमुळे कर वजा जाता नुकसान पाऊणे दोन टक्का जीडीपी. दारुचे अर्थशास्त्र हे वस्तुतः अनर्थशास्त्र आहे.

जगात आज होणार्‍या एकूण रोग, मृत्यू व अपंगत्वाच्या सर्वोच्च सात कारणांमधे दारु एक आहे. भारतात दरवर्षी दारुमुळे पाच लक्ष मृत्यू होतात. विजय वडेट्टीवारांनी असा संशय व्यक्त केला आहे की, “शासनाकडे नसलेली आकडेवारी डॉ. अभय बंगांकडे असते". त्यांच्या माहितीसाठी भारतासाठी हा मृत्यूंचा आकडा जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दारू बंदी असलेल्या भारतातील पाच राज्यांचा अभ्यास करुन हॅवॉर्ड विद्यापीठ व व वर्ल्ड बँकच्या तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की दारु बंदीमुळे त्या राज्यातील स्त्रियांवरील हिंसा व गुन्हे 50 टक्क्यांनी कमी झाले. हेच लॉकडाऊनच्या काळात अधिक प्रखरतेने घडले असणार. म्हणजे आता उत्पन्नासाठी शासन दारू खुली करेल तर त्यामुळे स्त्रियांवरील हिंसा व गुन्हे दुप्पट होणार. निर्भयाकांड दुप्पट.

दारु दुकाने उघडल्यावर जी वेड्यासारखी गर्दी गोळा झाली त्या माणसांची आपल्याला काळजी वाटायला हवी. दारुसाठी अतिआतुर, अस्वस्थ झालेले आणि सर्व नियम, काळजी, धाब्यावर बसवणार्‍या ह्या पुरुषांपैकी अनेक जण वस्तुतः दारुवर अवलंबित (डिपेंडंट) किंवा दारुमुळे होणार्‍या विविध दुष्परिणामांनी ग्रसित असावे. भारतात जवळपास वीस कोटी माणसं दारु पितात, त्यापैकी पाच कोटी हे दारू -दुष्परिणाम-ग्रस्त’आहेत व त्यापैकी दरवर्षी पाच लक्ष मरतात. हा झाला दारुचा जमाखर्च. कोरोनाला थांबविण्यासाठी भारताने दारु व तंबाखूविक्री बंद केली आहे. कोरोनामुळे आजपर्यंत देशात दोन हजार मृत्यू झाले. दारुमुळे दरवर्षी पाच लक्ष व तंबाखूमुळे दहा लक्ष मृत्यू होतात. कोरोनाच्या निमित्ताने दारू व तंबाखू बंदी किंवा कमी झाल्यास अनेक पट मोठा फायदा होईल. शासनाने, समाजाने ही आलेली संधी गमाऊ नये.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; जळगावमधील भाजप आमदाराच्या पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

Corona Ground Report | अमरावतीच्या परतवाड्यात दारु खरेदीसाठी मध्यरात्री पिशवी ठेवत लावले नंबर

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Aditi Tatkare: रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Embed widget