एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : "उद्धव ठाकरेंची पोटदुखी वेगळी; सत्ता गेल्याचं त्यांना दुःख; भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला?"

शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला? अशी विचारणा त्यांनी केली.

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे सॅम्पल असा उल्लेख करत केंद्र सरकारने ते परत न्यावे असे सांगत महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला? अशी विचारणा त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाहीय. राज्यपाल यांच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याच त्यांना दुःखं आहे. महाराष्ट्राची जनता ठरवेल की ताकद कमी केली की वाढवली. गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद वाढवली आहे. एका क्लिकवर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांना विचाले असता ते म्हणाले की, तुमची सत्ता असताना विधानसभेत सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नाही? इतके तुम्ही लाचार झाला होता, दुर्मिळ झाला होता.

केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून जोरदार टीका केली. तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का? आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका करायची. तुमचे उद्योग जनतेला माहीत आहे, बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात.  आपण विक झाले म्हणून दुसऱ्याला विक म्हणता, अनेक पक्षांचे आधार घेत असल्याचे केसरकर म्हणाले.  

उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा

ज्यांचं सरकार केंद्रात त्यांच्या विचारसरणीची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात, मग त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं जातं का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. केंद्राने हे सॅंपल परत न्यावं अन्यथा त्यांना महाराष्ट्रांचा इंगा दाखवणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वानी एकत्र यावं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?
विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस उरले, पण उद्धव ठाकरेंची नकारघंटा कायम, मग मविआचा उमेदवार कोण?
विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस उरले, पण उद्धव ठाकरेंची नकारघंटा कायम, मग मविआचा उमेदवार कोण?
Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पुण्यातील जुन्नरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू, शेतात काम करताना झाला दुर्दैवी अंत
पुण्यातील जुन्नरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू, शेतात काम करताना झाला दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Vidhanparishad Election 2026 BJP: विधानपरिषद निवडणुकीबाबत भाजपच्या गोटातून महत्त्वाची अपडेट, दिल्लीतून वरिष्ठांचा एक मेसेज अन् निम्म्या उमेदवारांचा पत्ता कट
विधानपरिषद निवडणुकीबाबत भाजपच्या गोटातून महत्त्वाची अपडेट, दिल्लीतून वरिष्ठांचा एक मेसेज अन् निम्म्या उमेदवारांचा पत्ता कट
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
Embed widget