एक्स्प्लोर

Sharad Pawar : सध्या हनुमान चालीसा पुढं आणताहेत, यातून मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar : लोकांचे मूळ प्रश्न बाजूला सारून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Sharad Pawar : सध्या राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरु आहे. जे मुळ प्रश्न आहेत ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सगळे सुरु असताना आपला मूलभूत प्रश्न सुटणार आहे का. केवळ सर्वांना मूलभूत प्रश्नांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी म्हटले. 

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भटके विमुक्त बहुजन समाजाकडून कृज्ञता गौरव सन्मान सोहळा पार पडत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव घेता त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी म्हटले की, मध्यंतरी एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी फुले आंबेडकर, शाहू महाराज यांचं नाव घेतो. महात्मा फुलेंच नाव मी का घ्यायचं नाही, असा माझा त्यांना प्रश्न आहे. ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या पत्नीनं आपलं आयुष्य लोकांच्या शिक्षणासाठी घालावल त्याचं नाव घ्यायचं नाही का, असा प्रश्नही पवार यांनी केला. दुष्काळ असताना कैद्यांना खडी फोडण्याची शिक्षा न देता त्याऐवजी धरण बांधा अशी सूचना महात्मा फुले यांनी भारतात आलेल्या ब्रिटनच्या राजाला दिली होती असे सांगत महात्मा फुले हे दूरदृष्टी असलेले समाजसुधारक असल्याचे पवार यांनी म्हटले.

शाहु महाराज हे सामान्यांचे राजे होते. ते शहरात कधी राहिले नाहीत. संस्थानातील गोरगरिबाला भेटत असे. त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत रहायचे. आधुनिकतेचा विचार करणारे शाहु महाराज होते. त्याच नाव घ्यायचं नाही का, असा सवाल ही पवार यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान तयार केले. त्यासोबत देशाचे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी देशात मोठी धरणे बांधली. वीज निर्मिती केंद्रे उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव घ्यायचं नाही का असा सवाल ही त्यांनी केला. 

भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी बैठकीचे आश्वासन

राज्यात अनेक जाती जमातीपर्यंत विकास पोहचला नाही. अजूनही भटक्या विमुक्त समाजातील तरुण वर्ग मागासलेला आहे. आज समाजाकडून 28 मागण्या करण्यात आल्या. एकदम सर्व मागण्या मान्य होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगताना म्हटले की, सर्वात आधी महत्त्वाच्या मागण्यांवर ठरवून त्यावर काम करा. राज्य मंत्रिमंडळातील संबंधित मंत्र्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, 12 वर्षांचा वनवास संपला
आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, 12 वर्षांचा वनवास संपला
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
धक्कादायक! भजन सुरु असतानाच महाराज कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन  
धक्कादायक! भजन सुरु असतानाच महाराज कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन  
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget