एक्स्प्लोर

Sharad Pawar : सध्या हनुमान चालीसा पुढं आणताहेत, यातून मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar : लोकांचे मूळ प्रश्न बाजूला सारून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Sharad Pawar : सध्या राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरु आहे. जे मुळ प्रश्न आहेत ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सगळे सुरु असताना आपला मूलभूत प्रश्न सुटणार आहे का. केवळ सर्वांना मूलभूत प्रश्नांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी म्हटले. 

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भटके विमुक्त बहुजन समाजाकडून कृज्ञता गौरव सन्मान सोहळा पार पडत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव घेता त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी म्हटले की, मध्यंतरी एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी फुले आंबेडकर, शाहू महाराज यांचं नाव घेतो. महात्मा फुलेंच नाव मी का घ्यायचं नाही, असा माझा त्यांना प्रश्न आहे. ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या पत्नीनं आपलं आयुष्य लोकांच्या शिक्षणासाठी घालावल त्याचं नाव घ्यायचं नाही का, असा प्रश्नही पवार यांनी केला. दुष्काळ असताना कैद्यांना खडी फोडण्याची शिक्षा न देता त्याऐवजी धरण बांधा अशी सूचना महात्मा फुले यांनी भारतात आलेल्या ब्रिटनच्या राजाला दिली होती असे सांगत महात्मा फुले हे दूरदृष्टी असलेले समाजसुधारक असल्याचे पवार यांनी म्हटले.

शाहु महाराज हे सामान्यांचे राजे होते. ते शहरात कधी राहिले नाहीत. संस्थानातील गोरगरिबाला भेटत असे. त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत रहायचे. आधुनिकतेचा विचार करणारे शाहु महाराज होते. त्याच नाव घ्यायचं नाही का, असा सवाल ही पवार यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान तयार केले. त्यासोबत देशाचे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी देशात मोठी धरणे बांधली. वीज निर्मिती केंद्रे उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव घ्यायचं नाही का असा सवाल ही त्यांनी केला. 

भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी बैठकीचे आश्वासन

राज्यात अनेक जाती जमातीपर्यंत विकास पोहचला नाही. अजूनही भटक्या विमुक्त समाजातील तरुण वर्ग मागासलेला आहे. आज समाजाकडून 28 मागण्या करण्यात आल्या. एकदम सर्व मागण्या मान्य होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगताना म्हटले की, सर्वात आधी महत्त्वाच्या मागण्यांवर ठरवून त्यावर काम करा. राज्य मंत्रिमंडळातील संबंधित मंत्र्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget