एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरी ट्राफिक पोलिसांची कारवाई; विक्रमी दंड वसूल!

प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करूनही लोक रस्त्यावर बिनदिकतपणे फिरताना दिसत आहेत. अशातच रत्नागिरी ट्रॅफिक पोलिसांन अनेकांवर कारवाई करत विक्रमी दंड वसुली केली आहे.

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते, बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. दरम्यान, यामध्ये रत्नागिरीकर किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक देखील कुठेच मागे नव्हते. रत्नागिरी शहर असो किंवा जिल्ह्यातील काही मुख्य ठिकाणं या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसून येत होती. प्रशासनानं केलेल्या आवाहनानंतर देखील त्याला हरताळ फासला जात होता. प्रत्येक जण केवळ मेडिकलला जात आहे असं उत्तर देताना दिसून येत होते. अनेकांनी तर, पाहुया बाहेरचं वातावरण आज कसं आहे? हे पाहण्यासाठी आलो आहे असं उत्तर दिलं. त्यामुळे वाहतूक पोलीस देखील काहीसे हतबल झालेले दिसून आले. अखेर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या आदेशानुसार या सर्व वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट, सिट बेल्ट नसणे, कागदपत्र नसणे आदी कारणांसाठी रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांवर अखेर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 1614 वाहन चालकांकडून 6 लाख 29 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी झालेली ही विक्रमी अशी कारवाई ठरली! वाहतूक पोलिसांनी नियमांवर बोट ठेवत केलेल्या कारवाईनंतर मात्र रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या हळूहळू कमी झाली. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. शिवाय, रात्रभर देखील पोलीस सध्या नाक्यानाक्यांवर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांना आवाहन
रविवारी जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. त्यानंतर कोरोनाविरोधातील लढाई आणखी तीव्र होईल अशी आशा होती. पण, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर शहरांमधील चित्र काही आश्वासक नव्हते. नागरिक आपल्या खासगी वाहनानं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याचं दिसून आले. दरम्यान, कोरोनाला हरवण्यासाठी केवळ एक दिवस नाही तर पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत, असे आवाहन सध्या शासन आणि प्रशासन करताना दिसत आहे. शिवाय, आम्ही केलेली ही दंडात्मक कारवाई विक्रमी म्हणून पाहण्यापेक्षा आजची परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांनी सहकार्य करावं. केवळ हौस म्हणून ही कारवाई करण्यात आलेली नाही. नियम पाळा आणि कोरोनाला हरवा अशी आवाहन देखील यावेळी वाहतूक पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
जिल्ह्याच्या सीमा बंद
राज्यात संचार बंदी लागू करण्यात आल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहिल. त्याबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पेट्रोल पंपधारक करत असलेल्या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे.
फक्त बाईकला मिळणार पेट्रोल
एकंदरीत सोमवारची स्थिती पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर फक्त दुचाकीकरता सकाळी 10 ते  12 आणि दुपारी  4 ते 6 या वेळेत पेट्रोल मिळणार आहे. रिक्षा, कार आणि जड वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा नियम लागू असेल.
संबंधित बातम्या : सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय? Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य? Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget