एक्स्प्लोर

वाढीव वीज बिलांवरुन जनतेला फसवणाऱ्या सरकारला पदवीधर निवडणुकीत शॉक द्या : देवेंद्र फडणवीस

आपल्या भाषणात फडणवीस यांनी या तीन पक्षांच्या सरकारवर टीका करताना बिहारच्या निकालांनी यांचा फुगा फुटल्याचे सांगितले. जे वातावरण बिहारसह अन्य राज्यात आहे, तेच महाराष्ट्रात असून देश फक्त मोदींवर विश्वास ठेवत असल्याचा टोला लगावला .

पंढरपूर :  कोरोनाच्या काळात राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. वीज बिल माफीबाबत घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या ठाकरे सरकारला  या विधानपरिषद निवडणुकीत जोरदार शॉक द्या, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ बोलावलेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजित निंबाळकर , खा जय सिद्धेश्वर स्वामी, आ सुभाष देशमुख, आ विजय देशमुख, आ प्रशांत परिचारक, आ गोपीचंद पडळकर, आ राम सातपुते, आ रणजितसिंह मोहिते पाटील, आ राजा राऊत यांचेसह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख अशी भली मोठी फौज या प्रचारात उतरली होती.

आपल्या भाषणात फडणवीस यांनी या तीन पक्षांच्या सरकारवर टीका करताना बिहारच्या निकालांनी यांचा फुगा फुटल्याचे सांगितले. जे वातावरण बिहारसह अन्य राज्यात आहे, तेच महाराष्ट्रात असून देश फक्त मोदींवर विश्वास ठेवत असल्याचा टोला लगावला .

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना जर तुम्ही भाजपच्या नेत्यांवर बोललं तर तुम्हालाही जशास तसे उत्तर मिळेल,  मग पुन्हा गोपीचंदच्या नावाने ओरडू नका असा इशारा  राष्ट्रवादी आणि इतरांना दिला. यावेळी लक्षण ढोबळे, मुन्ना महाडिक, सुभाष देशमुख यांनीही राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली

दरम्यान वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला शॉक देण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी भाजपकडून वीज बिल होळी आंदोलन करण्यात आलं. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार, मुंबईतून अतुल भातखळकरयांच्यासह अन्य सहकारी सहभागी झाले होते.

26 नोव्हेंबरला वाढीव वीज बिलाबाबत मनसेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक  

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेही आक्रमक झाली असून उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं ठाकरे सरकारला देण्यात आला आहे. मनसेच्या वतीनं 26 नोव्हेंबरला वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. वाढीव वीज बिलाविरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. "वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल असं सरकारनेच जाहीर केलं होतं. परंतु दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा," असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावाSanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Embed widget