एक्स्प्लोर

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्जमाफी यात्रेसाठी औपचारिक आमंत्रण देण्यात आलं..

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर निवासस्थानावर जात भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यामध्ये काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आवाहन केलं. या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांचा राज ठाकरे यांना अभ्यास आहे. मात्र, शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत, ही राज ठाकरे यांची खंत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. 

बच्चू कडूंच्या आवाहनाला राज ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद

बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागणी मागण्या यावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार मंथन करण्यात आले. मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेसाठी राज साहेबांना औपचारिक आमंत्रण देण्यात आलं आह. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याचा निर्धार या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी मुंबई, महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल 

या भेटीवेळी बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. बाळा नांदगावकर म्हणाले की बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी आम्हाला पाठवलं होतं. चक्काजाम आंदोलनाला देखील आमचा पाठिंबा होता. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज ठाकरे यांची भावना असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी परभणीतील पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. याबाबत राज ठाकरे सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांसाठी मुंबई महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे

दुसरीकडे, बच्चू कडू यांनी आजवर मुंबई अनेक मुद्यांवर बंद होताना आम्ही पाहिली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की हा शेतकऱ्यांसाठी लढा आहे. दरम्यान, राजकीय युती संदर्भात बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की निवडणूक येत असतात, जात असतात प्रत्येक गोष्टीसाठी निवडणुकीतून पाहता कामा नये. सध्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author अजय माने

अजय माने
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget