एक्स्प्लोर

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्जमाफी यात्रेसाठी औपचारिक आमंत्रण देण्यात आलं..

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर निवासस्थानावर जात भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यामध्ये काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आवाहन केलं. या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांचा राज ठाकरे यांना अभ्यास आहे. मात्र, शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत, ही राज ठाकरे यांची खंत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. 

बच्चू कडूंच्या आवाहनाला राज ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद

बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागणी मागण्या यावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार मंथन करण्यात आले. मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेसाठी राज साहेबांना औपचारिक आमंत्रण देण्यात आलं आह. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याचा निर्धार या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी मुंबई, महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल 

या भेटीवेळी बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. बाळा नांदगावकर म्हणाले की बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी आम्हाला पाठवलं होतं. चक्काजाम आंदोलनाला देखील आमचा पाठिंबा होता. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज ठाकरे यांची भावना असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी परभणीतील पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. याबाबत राज ठाकरे सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांसाठी मुंबई महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे

दुसरीकडे, बच्चू कडू यांनी आजवर मुंबई अनेक मुद्यांवर बंद होताना आम्ही पाहिली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की हा शेतकऱ्यांसाठी लढा आहे. दरम्यान, राजकीय युती संदर्भात बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की निवडणूक येत असतात, जात असतात प्रत्येक गोष्टीसाठी निवडणुकीतून पाहता कामा नये. सध्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget