एक्स्प्लोर

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्जमाफी यात्रेसाठी औपचारिक आमंत्रण देण्यात आलं..

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर निवासस्थानावर जात भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यामध्ये काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आवाहन केलं. या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांचा राज ठाकरे यांना अभ्यास आहे. मात्र, शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत, ही राज ठाकरे यांची खंत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. 

बच्चू कडूंच्या आवाहनाला राज ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद

बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागणी मागण्या यावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार मंथन करण्यात आले. मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेसाठी राज साहेबांना औपचारिक आमंत्रण देण्यात आलं आह. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याचा निर्धार या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी मुंबई, महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल 

या भेटीवेळी बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. बाळा नांदगावकर म्हणाले की बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी आम्हाला पाठवलं होतं. चक्काजाम आंदोलनाला देखील आमचा पाठिंबा होता. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज ठाकरे यांची भावना असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी परभणीतील पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. याबाबत राज ठाकरे सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांसाठी मुंबई महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे

दुसरीकडे, बच्चू कडू यांनी आजवर मुंबई अनेक मुद्यांवर बंद होताना आम्ही पाहिली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की हा शेतकऱ्यांसाठी लढा आहे. दरम्यान, राजकीय युती संदर्भात बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की निवडणूक येत असतात, जात असतात प्रत्येक गोष्टीसाठी निवडणुकीतून पाहता कामा नये. सध्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Rohini Khadse on Ladki Bahin Yojana: वहिनींचे सगळे लाड पुरवता, पण तुम्हाला लाडक्या बहिणी 'जड' झाल्यात का? रोहिणी खडसे फडणवीस-शिंदेंवर संतापल्या; म्हणाल्या, खंबीर 'दादा' आता नाही पण...
वहिनींचे सगळे लाड पुरवता, पण तुम्हाला लाडक्या बहिणी 'जड' झाल्यात का? रोहिणी खडसे फडणवीस-शिंदेंवर संतापल्या; म्हणाल्या, खंबीर 'दादा' आता नाही पण...
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Embed widget