एक्स्प्लोर

Manoj Jarange : 'लायकी' हा शब्द मागे घेतो, भुजबळांमुळे नाही तर प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यानंतर पटलं; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

Manoj Jarange On Prakash Ambedkar : छगन भुजबळ हे सवैंधानिक पदावर असूनही काहीही बरळत आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. मनोज जरांगेंनी त्यांच्या एका भाषणावेळी 'लायकी' शब्द वापरला आणि ओबीसी नेत्यांनी त्यावरुन जरांगेंना (Manoj Jarange) चांगलच टार्गेट केलं होतं. मात्र आता मनोज जरांगेंनी लायकी शब्द मागे घेत असल्याचं स्पष्ट सांगितलं. यावेळी भुजबळांसाठी (Chhagan Bhujbal) नाही तर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) सल्ल्याने हा शब्द मागे घेतो असं मनोज जरांगेंनी सांगितलं. 

मनोज जरांगे यांनी त्यांच्या एका भाषणात बोलताना 'ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आपण लायकी हा शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच मराठ्यांना न्याय मिळावा हाच हेतू असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. 

भुजबळांमुळे नाही तर प्रकाश आंबेडकरांमुळे शब्द मागे

लायकी हा शब्द मागे घेताना तो छगन भुजबळांमुळे नाही तर प्रकाश आंबेडकरांमुळे मागे घेत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला आपण ऐकला आहे. प्रकाश आंबेडकर हे एका उंचीचे नेते आहेत. त्यांनी जे बोललं ते पटलं आहे. पण प्रकाश आंबेडकरांमुळे हा शब्द मागे घेतो, त्या भुजबळांमुळे नाही. भुजबळ हे सवैंधानिक पदावर असले तरीही काहीही बरळतात. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू ते. 

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 

ते म्हणाले होते की, जरांगेंनी कोणत्या अँगलने तो शब्द वापरला ते माहिती नाही. पण त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांबद्दलच तो शब्द वापरला असावा. कारण मराठा समाजाचे एवढे नेते मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, पण त्यांनी समाजासाठी काहीही केलं नाही. 

धुळे आणि नांदेडमध्ये सभा

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची येथे 3 डिसेंबरला धुळ्यात जाहीर सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाकडून तयारीला वेग आला आहे. तर 8 डिसेंबरला मनोज जरांगे पाटलांची नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी सभा होणार आहे.

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget