एक्स्प्लोर

अजित पवारांकडं 27 आमदारांचं पाठबळ; बदल्यात 12 मंत्रिपदं अन् 15 महामंडळं?

महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये काही महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई : अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या महत्वाच्या मंत्र्यांची भेट घेतली. अजित पवारांकडं 27 आमदारांचा पाठींबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बदल्यात अजित पवार यांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये काही महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (25 नोव्हेंबर)सुनावणी होणार आहे. त्यामुळं उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. वर्षावर काय चर्चा झाली? प्रथमतः सुप्रीम कोर्टाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा होणार. या चर्चेत मुख्यमंत्री, वकील, भुओइंद्र यादव, गिरीश महाजन आणि विनोद तावडे उपस्थित असतील दुसरं म्हणजे अजित पवार गटाच्या पाठींब्याने जर भाजप बहुमत सिद्ध करू शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळ दिले जाऊ शकतात अजित पवार यांची या सत्ता स्थापनेच्या वाट्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुपेंद्र यादव यांच्यासोबत प्राथमिक चर्चा होणार आहे. यासाठी अजित पवार यांना 27 आमदार पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय मात्र हा आकडा मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे आजच्या बैठकीत अजित पवार यांचे विधिमंडळ गट नेते पद आणि व्हीपचा अधिकार कायम कसा ठेवता येईल याबाबत खलबतं होतील. याच मुद्द्यावर उद्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि सत्ता समीकरण अवलंबून असेल ऑपरेशन लोटस आणि शिवतेज? भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज सुरु केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांपैकी काही आमदार परतले आहेत. मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं कोणी कुणाला मतदान केले हे समजणार नाही. याचसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जरी भाजपशी युती तोडली असली तरी अजूनही शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. यासाठी भाजप ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे. संबंधित बातम्या - भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला : खासदार संजय राऊत "पवारसाहेबांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार" अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं Ajit Pawar | अजित पवार गटाला 12 मंत्रिपद मिळणार- सूत्र | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
Embed widget